राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन!

05 Jul 2022 15:08:27

eassy
 
 
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागाच्या वतीने खुली राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता रशिया - युक्रेन युद्धाचे जागतिक परिणाम आणि भारताची भूमिका, भारताचे नवीन शैक्षणिक धोरण देशातील शिक्षणाची स्थिती बदलेल का?, वृत्तवाहिन्यांची अनोळखी सूत्रं, लॉकडाऊन मुळे बदललेली उद्योग क्षेत्रं, वाढते तापमान, पर्यावरणासाठी आव्हान! असे निबंधाचे विषय आहेत. निबंधाची शब्दमर्यादा १५०० शब्द इतकी आहे. वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर आपले विचार निबंध रूपाने लिहून त्यावर आपलं नाव पत्ता आणि भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा तसेच आपला निबंध टंकलिखित किंवा स्वच्छ अक्षरात लिहून त्याची स्कॅन कॉपी पीडीएफ स्वरूपात संस्थेच्या कार्यालयीन पत्त्यावर किंवा vumm 1954@Gmail.com या ईमेल आयडीवर दिनांक १३ जुलै पूर्वी पाठवावेत. ई-मेल मधील विषयात खुली राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२२ असे नमूद करावे.
 
 
अधिक माहितीसाठी संपर्क :
शिक्षण प्रमुख विशाल पोळ ८०८०६७६०४५,, सहा.शिक्षण प्रमुख साहिल पाटील ९०७६३५९४१६.
 
 
Powered By Sangraha 9.0