मुंबई : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या देशाबद्दल लोकांच्या मनातील देशभक्ती, सदैव एकतेची भावना दृढ होत जावी, यासाठी भारतीय “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत दि. ९ ते १७ ऑगस्ट,२०२२ या कालावधीमध्ये राज्यात “स्वराज्य महोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक स्तरांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर, ग्रामस्तर अशा चार स्तरांवरील कार्यक्रमांचे आयोजन :
राज्य स्तरावरील कार्यक्रम: समूह राष्ट्रगान, आयकॉनिक सांस्कृतिक कार्यक्रम, कॉफीटेबल बुक प्रकाशन, ६० मान्यवरांच्या लेखांच्या ग्रंथाचे प्रकाशन, गिरगाव चौपाटीवर आकर्षक विद्युत रोषणाई.
जिल्हा स्तरावरील कार्यक्रम : हुतात्मा स्मारके सुशोभिकरण, रस्ते संग्रहालय, ७५ फूट उंचीचा राष्ट्रध्वज, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विशेष सभेचे आयोजन, एनसीसी/एनएस एस सायक्लोथॉन/ मॅरेथॉन स्पर्धा आयोजन, विविध निबंध, चित्रकला व वत्कृत्व स्पर्धा आयोजन, प्रदर्शने, हर घर तिरंगा, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यापीठस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन, पुरातत्व दृष्ट्या महत्वाच्या स्थळांची स्वच्छता मोहीम, जिल्ह्याच्या मुख्यालयी संविधान स्तंभाची उभारणी इत्यादी.
तालुका स्तरावरील कार्यक्रम : वृक्षारोपण मोहीम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभा, वारसा स्थळ / पुरातत्व दत्तक योजना, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आकाम लोगो, स्वच्छता मोहीम, संविधान स्तंभ उभारणी.
ग्राम स्तरावरील कार्यक्रम : विशेष ग्रामसभा, हर घर तिरंगा, प्रभात फेरी, स्वातंत्र्य सैनिकांचे मार्गदर्शन, स्वच्छता मोहीम, महिला मेळावे, मोबाईलचे दुष्परिणाम मार्गदर्शन व चर्चा, अर्थसाक्षरता विषयक शिबीर, शेतकरी मेळावे, पर्यावरण संर्वधन शपथ, वृक्षारोपण, शालेय स्पर्धा, किशोरी मेळावे, देशभक्तीपर चित्रपट दाखविणे.