काश्मिरी पंडितांबद्दलचे वक्तव्य भोवले! अखेर साई पल्लवी विरोधात गुन्हा दाखल!

17 Jun 2022 15:28:13

sai
 
 
 
मुंबई : काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री साई पल्लवी विरोधात हैद्राबादमधील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. 'गोतस्करी' आणि 'काश्मिरी पंडितांचा झालेला नरसंहार' या बाबत साई पल्लवीने वादग्रस्त विधान केल्याचा आरोप तिच्यावर बजरंग दलाच्या नेत्यांनी केला आहे. आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अशाप्रकारच्या वक्तव्याचा आधार घेणे या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर याबद्दल तीव्र पडसाद उमटले आहेत.
 
 
 
साई पल्लवीचा आगामी चित्रपट 'विराट पर्वम' च्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत गोतस्करी करणाऱ्या मुस्लीमांची हत्या आणि काश्मिरी पंडितांची हत्या हा एकच प्रकार आहे, असे वक्तव्य तिने या मुलाखती दरम्यान केले. एका मुलाखतीमध्ये साईने म्हटले, 'माझ्या मते हिंसाचारातून काहीही साध्य होत नाही. माझी भूमिका तटस्थ आहे. 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटात काश्मिरी पंडितांबरोबर झालेला अन्याय, हत्याकांड दाखवले आहे. तर काही दिवसांपूर्वी एक गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणऱ्या मुस्लीम व्यक्तीला मारहाण करत 'जय श्रीराम' च्या घोषणा देण्यात आल्या. मग या दोन घटनांमध्ये काय फरक आहे?', असा सवाल तिने विचारला.
 
 
 
सई पल्लवीचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर आता नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. लोकांचे म्हणणे आहे की संपूर्ण संभाषण हाताळताना, ती स्वतःला निःपक्षपाती दाखवत काश्मिरी पंडितांची तुलना गाय तस्करांशी करत आहे. एका काश्मिरी हिंदूने तिच्या वक्तव्यावर उत्तर देत म्हणतोय की, 'पल्लवी, असेच कोणत्याही अनोळखी मुस्लिमांना मारहाण करणे आणि संपूर्ण समुदायाची हत्या करणे, त्यांना मुळापासून संपवणे यात फरक आहे. आमच्या वेदनेवर फुंकर घालता येत नसेल तर त्याची खपली काढून आणखी दुखवू तरी नकोस, इथे ये आणि आमचे तुटलेले घर बघ; आम्ही नरसंहार बघितला आहे पण न्याय अजून पहिला नाही. प्रत्येक गोष्टीत काहीतरी सुप्त हेतू असतो असे समजणे बंद करा .'
Powered By Sangraha 9.0