आसाममध्ये निसर्गाचे रौद्र तांडव

23 May 2022 17:34:52

aasam
 
 
 
गुवाहाटी : आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे हाहाकार माजला आहे. पुरामुळे आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल ७ लाखांहून अधिक लोकांना या पुराचा फटका बसला असून अनेक गावच्या गावं पाण्याखाली गेली आहेत. पूर आणि भूस्खलन यांमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातील २७ जिल्ह्यांची परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे.
 
 
 
 
आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीमुळे येणाऱ्या पुरांमुळे वारंवार जनजीवन विस्कळीत होत असते. केंद्र सरकारच्या वतीने ईशान्य भारतात पायाभूत सुविधांची अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत या कामांनाही या पुराचा फटका बसत असतो. यावेळीही पुरामुळे झालेले नुकसान भरून निघण्यासाठी आणि जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्षा अलका उपाध्याय यांनी आसाममधील पुराचा फाटक बसलेल्या सर्व रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी असे आदेश दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0