मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचे आव्हान दिलेल्या राणा दाम्पत्याला अजूनही काही दिवस तुरुंगात काढावे लागणार आहेत. सत्र न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यांच्या जामीन आर्जवर आता बुधवारी सुनावणी घेण्यात येईल. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेण्यात आली असून कोर्टाने यावरचा निकाल राखून ठेवला आहे. सोमवारी न्ययालयाला या खटल्याची सुनावणी पूर्ण करणे शक्य नसल्याने न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे..