मुंबई : ''राजसाहेब ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल'', असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी बॅनरबाजीद्वारे दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जूनच्या पहिल्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा दौऱ्याला तेथील भाजपचे खासदार बृजभूषण यांनी विरोध केला आहे. '' राज ठाकरेंना अयोध्येच्या जमिनीवर पाय ठेवू देणार नाही.'', असे आव्हन बृजभूषण यांनी दिल्याने राज्यात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना रोखणं आवश्यक आहे, अन्यथा संत आणि नागासाहू यांचा सामना करावा लागेल, असे थेट पत्र यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं आहे.'' राजकीय लढाई जरूर करावी परंतु, देवाच्या दर्शनासाठी कुणालाही अडवायचं नाही! राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला सर्व साधू-संतांचा पाठिंबा आहे'', असे गुरु माँ कांचनगिरी यांनी सांगितले.