मुंबई महापालिकेची निवडणूक 'या' कालावधीत होणार!

17 May 2022 17:38:29

Mumbai Municipal
 
 
 
 
  
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका पावसाळा झाल्यावर घ्याव्यात या संदर्भातील विनंती अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. या अर्जावर मंगळवार, दि. १७ मे रोजी न्यायालयात सुनावणी पार पडली. न्या. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
 
 
 
ज्या ठिकाणी फार पाऊस पडत नाही त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला हरकत आहे का?, असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे. जिल्हानिहाय्य आढावा घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम तयार करावा असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग निवडणुकांबाबत कशाप्रकारे निवडणुका घेते हे पहावे लागेल.
 
 
 
न्यायालयाने म्हटले की, "ज्या ठिकाणी पाऊस कमी असतो अशा ठिकाणी निवडणुका थांबवण्याची काय गरज आहे? जिल्हानिहाय्य आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम तयार करावा. ज्या ठिकाणी जास्त पाऊस असतो उदाहरणार्थ कोकण, मुंबई सारख्या भागात आम्ही निवडणूक आयोगाची पावसामुळे होणारी अडचण आम्ही समजू शकतो.
 
 
 
या ठिकाणी पावसाळ्यानंतर निवडणुका घेऊ शकतो. त्यानुसार निवडणुकांचा कार्यक्रम तयार करावा. सर्वोच्च न्यायालयाने पुढे म्हटले, ज्या ठिकाणी पाऊस कमी असतो अशा ठिकाणी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत थांबण्याची गरज नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोग कशा प्रकारे निवडणुकांचा कार्यक्रम आखते हे पहावे लागेल.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0