पुणे : संभाजी राजे यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत, राज्यसभेची अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. यापुढे ते कोणत्याच पक्षाचा सदस्य असणार नाहीत असे देखील म्हणाले. स्वराज्य संघटनेची स्थापना करून राज्यभर दौरे करणार आहेत.
सर्व समाजबांधवांना काय वाटते, याबद्दल त्यांची भावना जाणून घेतल्यानंतर पुढची वाटचाल करणार असल्याचे संभाजी राजे म्हणाले. पक्षाचे चिन्ह, रंग अद्याप ठरला नसल्याचे स्पष्ट केले. अनेकांनी केलेल्या विनंती नंतर निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याचे सांगितले.