नाशिक: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात आवाज उठवताना त्याविरोधात हनुमान चालीसा म्हणण्यास सांगितले होते. मनसेच्या या भूमिकेवर टीका करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांचेच हसे झाले. "यांच्यापैकी कित्येक नेत्यांना साधे राष्ट्रगीतही म्हणता येत नाही आणि हे हनुमान चालीसा म्हणून दाखवणार आहेत, आता मी तुम्हांला हनुमान चालीसा म्हणून दाखवतो" असे म्हणून त्यांनी चक्क रामदास स्वामींनी रचलेले मारुतीस्तोत्र म्हणून दाखवले. याच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
"राज ठाकरे या भोंग्या मागील आवाज कोणाचा आहे, हे जनतेला कळलं आहे. त्यामुळे आज हनुमान जयंतीलाच भोंग्यांचं राजकारण संपलं आहे," अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. एमआयएमकडून भाजप जे राजकारण करू इच्छित आहे आणि त्याचा दाखला कोल्हापूरच्या निवडणुकीत मिळाला आहे. तसेच शिवसेना प्रमुखांची कॉपी करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न काहींनी केला, पण लोकं असं स्वीकारत नाहीत. राज ठाकरे या भोंग्या मागील आवाज कोणाचा आहे, हे जनतेला कळलं आहे. त्यामुळे आज हनुमान जयंतीलाच भोंग्यांचं राजकारण संपलं आहे," संजय राऊत यांनी अशा शब्दात राज ठाकरेंना टोला लगावला आहे.