बोरिवलीत कांदळवनांवर भराव टाकणाऱ्यांवर धडक कारवाई

    30-Mar-2022
Total Views | 190
mangrove



मुंबई - उपनगरातील कांदळवनांवर भराव टाकणाऱ्यांवर वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. बोरिवली येथील धारिवली गावातील कांदळवनावर भराव टाकणाऱ्या डंपरला ताब्यात घेण्यात आले असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.


राज्यातील कांदळवन क्षेत्राला राखीव वनक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. म्हणजेच कांदळवनाच्या झाडांची तोड करणे, त्यांना जाळणे, त्यावर मातीचा राडारोडा टाकणे कायद्याने गुुन्हा आहे. अशा परिस्थितीत काही समाजकंटकांकडून छुप्या पद्धतीने कांदळवने तोडली जातात किंवा त्यावर राडारोडा टाकला जातो. मुंबईसारख्या शहरी भागात असणाऱ्या कांदळवनांमध्ये हा प्रकार सर्रास केला जातो. अशाच प्रकारे बोरिवलीतील मौज एरंगळ येथील धारिवली गावातील कांदळवनांवर भराव टाकणाऱ्या काही व्यक्तींना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. २६ मार्च रोजी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.


२५ जानेवारी रोजी मध्यरात्री गस्ती दरम्यान ३.१५ वाजता काही डंपर आम्हाला धारिवली गावा लगत असणाऱ्या कांदळवनाच्या राखीव क्षेत्रात मातीचा भरणा करताना दिसले. त्याठिकाणी धाड टाकून आम्ही दोन डंपर पकडल्याची माहिती कांदळवन कक्षाचे पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी शरण देशपांडे यांनी दिली. या कारवाईमधून अन्सारी रफिक, रमेश मौर्या , राहुल जैसवाल, अजय खाडे आणि मोजेस बिंग या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. ही कारवाई विभागीय वनअधिकारी आदर्श रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल शरण देशपांडे, वनरक्षक संतोष जाधव, अजित परब, वनपाल हर्षल साठे, महादेव शिगांडे आणि वाहनचालक राकेश धवाळी यांनी केली.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121