कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या बीरभूम हिंसाचार प्रकरणी इथल्या विधानसभेत भाजप आमदारांकडून यासंदर्भात सोमवारी चर्चेची मागणी करण्यात आली होती. मात्र तृणमूल काँग्रेसच्या आमदारांकडून यास तीव्र विरोध दर्शवण्यात आला. आक्रमक भूमिका घेत हातापाई झाल्याचेही यावेळी दिसून आले. भाजप आमदार मनोज तिग्गा यांदरम्यान मारहाण झाली असून संभागृहात घडलेल्या प्रकरणादरम्यान उपस्थित सुरक्षा रक्षकांनीही आपल्यावर हल्ला केला असल्याचे भाजप आमदारांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर आता भाजपच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले असून यामध्ये शुभेंदू अधिकारी, मनोज तिग्गा, शंकर घोष, दीपक बर्मन आणि नरहरी महतो यांचा समावेश आहे.