मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या सात दिवसांपासून युद्ध सुरु आहे. युक्रेनमधल्या कीव शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचे काम मोदी सरकारकडून युद्ध पातळीवर सुरु आहे. काँग्रेसकडून मात्र परराष्ट्र मंत्र्यांच्या घराबाहेर निदर्शने केल्याचे दिसून येत आहे. "प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारी बेशरम काँग्रेस.", अशी जोरदार टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर केली आहे.
"मोदी सरकारने २२५२ विद्यार्थ्यांना यूक्रेनहून परत आणले, ९००० विद्यार्थ्यांना यूक्रेन बाहेर हलवले. बाकी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडून आता प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. काँग्रेस मात्र परराष्ट्र मंत्र्यांच्या घराबाहेर निदर्शने करत आहेत.", असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.