लादेनच्या आश्रयदात्यांनी भारताला शिकवू नये

16 Dec 2022 12:46:07

एस. जयशंकर
 

नवी दिल्ली
: “ओसामा बिन लादेन यास आपल्या देशात आश्रय देऊन त्यास पाळणार्‍यांनी भारताला शिकवू नये,” अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या भारताच्या अध्यक्षतेखाली बोलाविलेल्या बैठकीमध्ये पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी जम्मू - काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यास परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अतिशय सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर देऊन आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पुन्हा एकदा पाकची लक्तरे वेशीवर टांगली.


परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले, “संपूर्ण जग ज्याला अस्वीकार्य मानते, त्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सीमापार दहशतवादाचे प्रायोजक असणार्‍यांनी ही बाब नेहमी लक्षात ठेवावी. ओसामा बिन लादेनला आपल्या देशात आश्रय देऊन त्याला पाळणार्‍यांनी आणि शेजारी देशातील संसदेवर हल्ला करणार्‍यांनी या परिषदेस कोणत्याही प्रकारचा शहाणपणा शिकवू नये,” असेही जयशंकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
Powered By Sangraha 9.0