डोंबिवली: डोंबिवली शहरात विकासकामे वेगाने सुरू झाली आहेत. ही विकासकामे होत असताना कामाकडे नीट लक्ष दिले पाहिजे. प्रभागातील कोणतेही काम असो ते चांगले झाले पाहिजे यासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे असे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले.
डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील नवचैतन्य नगर उद्यानाच्या विकास कामांसाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी 25 लाखांचा निधी मंजूर केला आहे. या विकासकामांचे भूमीपूजन स्थानिक नागरिक व मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार पाटील बोलत होते. या सोहळ्य़ाला मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील, विधानसभा सचिव अरूण जांभळे, उपशहर अध्यक्ष प्रभाकर जाधव, प्रेम पाटील, विद्यार्थी सेना जिल्हा सचिव प्रितेश पाटील, विभाग अध्यक्ष संजय चव्हाण, प्रदीप चौधरी, शाखा अध्यक्ष सुरज शिंदे, महिला विभाग अध्यक्ष ज्योती पाटील यांच्यासह डोंबिवली एमआयडीसी परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
राजू पाटील म्हणाले, नवचैतन्य उद्यानाचे काम देखील चांगल्या पध्दतीने करून घ्या. एमआयडीसीतील रस्त्याकडे खासदाराचे देखील लक्ष दिले आहे. या परिसरातील सुध्दा रस्त्यांच्या कामाला सुरूवात झाली आहे. हे रस्त्यांची रूंदी जास्त झाल्यास नागरिकांच्या घरात पावसाळ्य़ात पाणी येईल याक डे परिसरातील नागरिकांनी लक्ष वेधले आहे. या परिसरातील नागरिक जागृरूक आहेत त्याबाबत त्यांनी नागरिकांचे कौतुक ही केले. तसेच जागृरूक राहणो हे प्रत्येक सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे असे ही ते म्हणाले.