छत्रपतींचा इतिहास वादग्रस्त करण्याची सुरुवात पवारांनी केली : राज ठाकरे

"राष्ट्रवादीच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वादग्रस्त इतिहासाला प्रारंभ!"

    01-Dec-2022
Total Views |

Raj Thackeray
राज ठाकरे सिंधुदुर्ग दौरा


कणकवली :
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांनी महाराजांच्या इतिहासाला वादग्रस्त ठरविण्याचा प्रयत्न केला. जातीपातीच्या आधारावर राजकारण करण्याचा प्रयत्न करुन मराठा आणि इतर समाजात तेढ निर्माण करुन त्याचा फायदा स्वतःच्या राजकारणासाठी करुन घेतला, अशी घणाघाती टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. आपल्या सिधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल भाष्य केले.

"शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाला वादग्रस्त बनविण्याचे काम सुरू झाले. शरद पवार कधीही आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेखही करत नव्हते. त्यांची जूनी सगळी भाषणं काढून पहा. व्यासपीठावर शाहू फुले आंबेडकर, यांच्याच प्रतिमा त्यांच्या व्यासपीठावर दिसायच्या कारण महाराजांचे नाव घेतलं की मुस्लीम मतं मिळत नाहीत.", असा हल्लाबोल त्यांनी पवारांवर चढविला.

"त्यांनी एका भाषणातही म्हटलं होतं की शाहू-फुले-आंबेडकर हा एक विचार आहे, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार नाही का? त्यांच्या विचारांवरच हे महापुरुषांचे विचार आहेत ना? मूळ विचार हा शिवरायांचाच होता ना? शिवरायांची नावं घेतली की मूळ मुस्लीम मतं जातात. मग फंडींग देऊन कुठल्या तरी टोळ्या उभ्या करायच्या आणि मग त्यांच्याकडून शिवाजी महाराजांचे राजकारण करुन घ्यायचं. त्यानंतर मराठा समाज आणि इतर समाज, असा संघर्ष उभा करायचा. त्यानंतर दोघांचाही वापर राजकारण करुन घ्यायचं, मूळ विषय बाजूला ठेवायचा, असा घणाघात राज ठाकरेंनी शरद पवारांवर केला.", असा आरोपही त्यांनी केला.


'वेडात मराठे वीर दौडले सात', या चित्रपटाविषयीही त्यांनी उल्लेख केला. गजानन मेहंदळे आणि जयसिंगराव पवार यांनी सांगितलेल्या इतिहासाबद्दलच्या दाखल्यांवर राज ठाकरेंनी चर्चा केली. मेहंदळेंनी दिलेल्या संदर्भांचाही त्यांनी उल्लेख केला, "जगातल्या कोणत्याही इतिहासाच्या पानात ते सात होते दहा होते, असं कुठेही लिहीलेलं नाही. प्रतापराव गुजरांसोबत आत्तापर्यंत कोण कोण होते याचा काहीही पुरावा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांना पत्र पाठविले ते आजतागायत कुठेही नाही. त्याचा पत्राचा उल्लेख एका ठिकाणी आहे. प्रतापराव गुजर मारियेला आणि प्रतापराव गुजर पडला, असाच उल्लेख आहे. त्यामुळे गजानन मेहंदळे यांनी सांगितलेलं हा संदर्भ बरोबर आहे," असा दुजोरा ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवारांनी यांनी आपल्या भेटीत दिल्याचेही राज ठाकरे म्हणाले.


राज ठाकरे पुढे म्हणाले की, "इतिहास तसा सांगायला गेला तर तसा तो रुक्ष आहे. त्यामुळे आहे तसा इतिहासाचे दाखले कुणाकडे उपलब्ध नसतात. ते त्यांचा तर्क मांडतात. त्यामुळे तर्काच्या आधारावर, चुकीचा अर्ध न लागू देता. इतिहासकार उभा करत असतात. त्यामुळे आपल्याकडे अलेला मूळ इतिहास हा पोर्तुगिज, मोगल, ब्रिटीश यांच्याकडून आलेल्या दाखल्यांशिवाय महाराजांच्या काळात आलेला एक ग्रंथ म्हणजे शिवभारत याशिवाय अन्य कुठलेही दाखले उपलब्ध नाहीत. त्यामुळे चित्रपटात इतिहास दाखविताना सिनेमॅटीक लिबर्टीशिवाय ऐतिहासिक चित्रपट दाखविताच येत नाही. त्यामुळे अशाप्रकारे शिवरायांच्या इतिहासाला धक्का लावणारा अजून मायेचा पूत जन्माला यायचा आहे.", असे म्हणत 'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला.


राहुल गांधींना सावरकरांबद्दल बोलायची गरज नव्हती!


राज ठाकरेंनी राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचारही त्यांनी घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करायची आणि माध्यमांनीही त्यात फोडणी टाकल्याचा आरोप राज ठाकरेंनीही केला.


उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला टोला


मी आता फिरायला लागलो, तर काही जणांच्या पोटात गोळा यायला लागला, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्याबद्दल प्रश्न विचारला असता राज यांनी माझ्या पोटाबिटात कुठे गोळा कशाला येईल, असा टोला त्यांनी बंधू ठाकरेंना लगावला आहे.

जातीपलिकडे जाऊन इतिहास पाहण्याची गरज!


इतिहास संशोधकांनी सध्या सुरू असलेल्या जातीपातीत अडकलेला इतिहास सांगण्यावरुन सुरू असलेल्या राजकारणावर बोलणे गरजेचे आहे. तसेच जातीपलिकडे जाऊन इतिहास पहाण्याची गरज आहे, असेही आवाहन राज ठाकरेंनी केले.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.