मुंबई : दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर व्हॉट्सअप पुन्हा सुरू झालं आहे. भारतातल्या महत्वाच्या शहरांत २५ ऑक्टोबर रोजी दुपारी एक च्या सुमारास अचानक व्हाट्सअप मेसेंजर ठप्प झाले. आजच्या डिजिटल जगात आपण समाज माध्यमांवर अनेक गोष्टींसाठी अवलंबून आहोत. ईमेल सेवा वेळखाऊ असल्याने सहज व सोयीस्कर असलेले व्हाट्सअप अनेकदा एकमेकांशी संवाद करण्यासाठी वापरले जाते. काही तांत्रिक अडचणींमुळे व्हॉट्सप बंद झाल्याचे समजते. मुंबई, पुणे, कोलकाता, लखनौ व दिल्ली सारख्या भारतातल्या महत्वाच्या शहरांत सेवा तात्पुरती खंडित झाल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.