अजित पवारांच्या उपस्थितीत उस्मानाबादेत तानाजी सावंतांना धमकी

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी दिली धमकी

    02-Oct-2022
Total Views | 98
tanaji
 
उस्मानाबाद : "तानाजी सावंतांनी मराठ्यांबद्दल नीट बोलावं नाहीतर चौकात उगडा करुन मारु" अशा शब्दांत राज्याच्या विद्यमान आरोग्यमंत्र्याला धमकी दिली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत ही धमकी दिली आहे. तानाजी सावंतांचा मुजोरीपणा उतरावालाच पाहिजे असेही सुरेश पाटील पुढे म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषविलेल्या एका नेत्यासमोर ही अशी धमकी दिली गेली आहे, त्याने राज्याचे वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
 
मराठा आरक्षणाबद्दल बोलत असताना सुरेश पाटील यांची जीभ घसरली. "एक माजलेला मंत्री मराठा समाजाबद्दल बेभान बोलतो, आरक्षण आताच आठवले का? मराठ्यांना माज आला का? असे म्हणतो" असे म्हणत पाटील यांनी सावंतांना लक्ष्य केले. पुढे तर चक्क धमकीच दिली. याचबरोबरीने त्यांनी उघडपणे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादीचे नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले. तानाजी सावंतांच्या विरोधातील आघाडीचे नेतृत्व पार्थ यांनीच करावे म्हणजे आपल्याला यश मिळेल असा दावाही सुरेश पाटील यांनी केला आहे.
 
यानिमित्ताने विरोधी पक्षातील लोकांबद्दल राष्ट्रवादीचे नेते किती खुनशी मानसिकता ठेवून असतात हेच दिसून आले आहे. तानाजी सावंत शिंदे गटाकडे गेल्याने याआधीही जिल्ह्यातील शिवसैनिकांनी त्यांच्या घरावर हल्ला केला होता. आधी शिवसैनिक आणि आता राष्ट्रवादी, शिंदे गटाच्या उठावाने महाविकास आघाडीची सत्ता गेल्याचा राग अजूनही तसाच आहे हे ते सातत्याने उघड करत आहेत. हेच या घटनेतून दिसून येते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121