लोकसत्ता आणि गिरीश कुबेर विरोधात अमरावतीत गुन्हा दाखल

शिवराय कुळकर्णी यांची तक्रार

    16-Oct-2022
Total Views | 741
shivray kulkarni
 
 
अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणा नंतर दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्राने जाती जातीत तेढ निर्माण करणारे वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त खोटे, गैरसमज पसरवणारे, जातीय सद्भाव खराब करणारे आणि काही समाज घटकांचा अपमान करणारे असल्याने लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, नागपूर आवृत्तीचे राजेश्वर ठाकरे आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, या भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या तक्रारीवरून लोकसत्ता व या दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर यांच्या विरुद्ध अमरावती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
  
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरात शुक्रवारी 7 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शास्त्रांचे आणि रिवाजांचे दाखले देत आपल्या देशात जातीभेद नसल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे वृत्त लोकसत्ता या दैनिकाने 8 ऑक्टोबर 2022 रोजी प्रकाशित केले.
 
 
या बातमीत डॉ. मोहन भागवत यांनी न बोललेले शब्द त्यांच्या तोंडी घालण्यात आले. " ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवे" असे कुठलेही वाक्य डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले नाही. ते न बोललेले त्यांच्या तोंडी हेतुपुरस्सर घालण्यात आले आणि बातमीत छापण्यात आले. संघविरोधकांनीही चिंतन करावे असे ते भाषण होते. संविधानाने अंगिकारलेल्या जातीरहित समाजाचा स्वीकार हेच भारताचे भविष्य असावे हे त्यांनी ठासून सांगितले. त्यांच्या या वक्तव्याचे समाजातून स्वागत झाले. मात्र, लोकसत्ता या दैनिकाने डॉ. भागवत यांच्या सुधारणावादाविषयी गैरसमज होणारे वृत्त प्रकाशित केले.
 
 
ज्या शब्दांचा डॉ. मोहन भागवत यांनी उल्लेख केला नाही, ते त्यांच्या तोंडी घालून एका समाजाला दुखावले, अपमानित केले आणि इतर समाजाच्या रोषास कारण निर्माण केले. सामाजिक सद्भाव खराब केला. लोकसत्ताने असे वृत्त जाणीवपूर्वक प्रकाशित केले, या आशयाची तक्रार शिवराय कुळकर्णी यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग यांच्याकडे दिली होती. त्यानंतर आज बडनेरा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी भादंवीच्या 153 A, 500, 501, 502, 504, 34 कलमान्वये गिरीश कुबेर व राजेश्वर ठाकरे विरुद्ध बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
 
 
शिवराय कुळकर्णी यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की, लोकसत्ताने समाज या शब्दाचे मुद्दाम चुकीचे interpretation केले. डॉ. भागवत यांनी आपल्या भाषणात एकदाही न उच्चारलेले जातींचे शब्द त्यांच्या तोंडी घालून विधायकतेला काळीमा फासला. लोकसत्ताकारांनी एका ठरावीक जातीचा अवमान करून इतर जातींना चिथावणी दिली आहे. हेतुपुरस्सर जातीभेद केला. हे वृत्त खोटे, गैरसमज पसरवणारे, जातीय सदभाव खराब करणारे आणि काही समाज घटकांचा अपमान करणारे असल्याने लोकसत्ताचे संपादक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, यासाठी ही तक्रार देत आहे.
 
 
 गिरीश कुबेर, राजेश्वर ठाकरे आणि लोकसत्ताचे मालक यांनी सामाजिक सद्भाव बिघडवणारे वृत्त हेतुपुरस्सर छापले. या वृत्ताने एका जातीच्या लोकांचा अपमान झाला. माझ्यासारख्या संघ स्वयंसेवक असलेल्यांचा देखील त्यांनी अपमान केला. धादांत खोटे वृत्त प्रकाशित करून समाजाची फसवणूक केली आणि सामाजिक तेढ निर्माण केली. या वृत्तामुळे जाती जातीत भांडणे लागली व सामाजिक सद्भाव खराब झाला. या खोट्या वृत्ताला खरे मानून देशभर इतरांनी पण ते प्रकाशित केले. यामुळे कटुता निर्माण झाली. या खोट्या वृत्तामुळे सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची बदनामी झाली. आमची प्रतिमा खराब झाली. या वृत्तामुळे समाजातील विविध जाती एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका करायला लागल्या त्याचे पर्यावसान वाईट होईल.लोकसत्ताकारांनी घटनेने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली केली, असे तक्रारीत नमूद केले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बीडीडीचा ‘तो’ कार्यक्रम अन् मोतीलाल नगरच्या आशा पल्लवित! ५५६ कुटुंबांना वेळेत घराच्या किल्ल्या मिळाल्याने जनमताचा रेटा पुनर्विकासाकडे

बीडीडीचा ‘तो’ कार्यक्रम अन् मोतीलाल नगरच्या आशा पल्लवित! ५५६ कुटुंबांना वेळेत घराच्या किल्ल्या मिळाल्याने जनमताचा रेटा पुनर्विकासाकडे

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वरळीच्या बीडीडी चाळीतील ५५६ कुटुंबांना त्यांच्या नव्या घराच्या किल्ल्या सुपूर्द करण्यात आल्या. ही घटना मुंबईच्या अनेक प्रलंबित पुनर्विकास प्रकल्पांच्या आणि तेथील रहिवाशांच्या आशा पल्लवित करणारी ठरली असून गोरेगावातील मोतीलाल नगरसारख्या वसाहतींत जनमताचा रेटा आता मोठ्या प्रमाणात म्हाडाच्या, पर्यायाने पुनर्विकासाच्या बाजूने झुकताना दिसत आहे...

...म्हणून शिल्पाच्या घरी यंदा बाप्पा येणार नाही, २२ वर्षांच्या परंपरेत पडणार खंड

...म्हणून शिल्पाच्या घरी यंदा बाप्पा येणार नाही, २२ वर्षांच्या परंपरेत पडणार खंड

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी वर्षानुवर्षे आपल्या घरात गणेशोत्सव साजरा करतात. सलमान खान, शिल्पा शेट्टी यांच्या घरातील गणेशाची विशेष चर्चा होते. २२ वर्षांपूर्वी शिल्पा शेट्टीने आपल्या घरी प्रथमच बाप्पा आणला होता. तेव्हापासून ती सातत्याने बाप्पाला घरी आणते. शिल्पाच्या घरी बाप्पा बसल्यावर ते फक्त सेलिब्रेशन नसतं, तर एक ग्लॅमरस फेस्टिव्हल असतो. तिच्या घरचा गणेशोत्सव म्हणजे लाईमलाईट, सेलिब्रिटी पाहूणे, डान्स, गाणी आणि एक वेगळाच जल्लोष. चाहते तिच्या घरासमोर दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र यावर्षी या प्रथेत खंड ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121