गेंड्यांची शिकार थांबवल्याबद्दल पीटरसनने मानले मोंदीचे आभार

20 Jan 2022 16:45:55
modi



मुंबई - इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने भारतात गेंड्याची शिकार रोखल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "वाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील वन्यजीवांच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्त्री-पुरुषांना माझा सलाम. मी यामधील बर्‍याच लोकांना भेटलो आहे आणि त्यांचा आदर करतो.” भारतातील गेंड्यांची शिकार जवळपास संपल्याचं सांगण्यात आलेल्या बातमीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही माहिती दिली.

 
काँग्रेस सरकारच्या काळात आसाममध्ये १६७ गेंड्यांची शिकार करण्यात आली होती. तर, २०२१ मध्ये फक्त १ गेंड्याची शिकार करण्यात आली होती. अशा प्रकारे, आसाममध्ये गेंड्याची शिकार ही २१ वर्षांतील नीचांकी पातळीवर आहे. भाजपने सत्तेत येण्यापूर्वीच एका शिंगाच्या गेंड्याच्या सुरक्षेची हमी देण्याचे आश्वासन दिले होते. राष्ट्रीय अभयारण्यात गेंड्यांच्या शिकारीलाही आळा बसला आहे. आसामचे विशेष डीजीपी जीपी सिंग हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या शिकार विरोधी टास्क फोर्सचे (एपीटीएफ) प्रमुख देखील आहेत.



सिंग यांनी सांगितले की, २०२१ मध्ये फक्त एप्रिल महिन्यातच गेंड्याची शिकार करण्यात आली होती. त्याशिवाय इतर कोणत्याही महिन्यात अशी घटना दिसली नाही. आसाममधील मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या सरकारने जून, २०२१ मध्ये या टास्क फोर्सची स्थापना केली होती. विशेष डीजीपी यांनी यासाठी आसाम सरकार आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचेही आभार मानले. एक शिंग असलेला गेंडा हे आसामचे प्रतीक मानले जाते. २००१-२०१६ दरम्यान त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार करण्यात आली होती. या काळात राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार होते. एकट्या २०१३-१४ मध्ये आसाममध्ये ५४ गेंड्यांची शिकार झाल्याची नोंद आहे. २००१-२०१६ दरम्यान, काझीरंगा राष्ट्रीय राखीव आणि मानसमध्ये एकूण १६७ गेंड्यांची शिकार करण्यात आली. आसाममध्ये सध्या ३,४०० गेंडे आहेत. गेल्या दशकात त्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
Powered By Sangraha 9.0