चित्रपटगृहांना ५० टक्क्यांची सूट, मग अजिंठा-एलोरा लेणी बंद का ? आदित्य ठाकरेंना सवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2022
Total Views |
ajintha



औरंगाबाद -
मंगळवारी औरंगाबादस्थित पर्यटन संघटनेने महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून महाराष्ट्रात कोविड-19 च्या वाढत्या घटनांमुळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेली एलोरा आणि अजिंठा लेणी यांसारखी ऐतिहासिक स्थळे पुन्हा उघडण्याची विनंती केली आहे.



औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन (ATDF) ने ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बंदिस्त असलेल्या चित्रपटगृहे सुरू ठेवण्यास परवानगी दिली जात आहे. परंतु, मोकळ्या जागेतील पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. पर्यटन स्थळांना भेट देणार्‍यांची संख्या साथीच्या आजाराच्या दृष्टीने मर्यादित असणे आवश्यक आहे. परंतु, त्या पूर्णपणे बंद केले जाऊ नयेत. एटीडीएफचे अध्यक्ष जसवंत सिंग राजपूत यांच्या म्हणण्यानुसार, एलोरा आणि अजिंठा लेणी यांसारखी जगप्रसिद्ध स्थळे बंद ठेवल्यास या भागातील पर्यटन क्षेत्रावर विपरित परिणाम होईल. राजपूत यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने महाराष्ट्र सरकारला अशा साइट्स ५० टक्के क्षमतेने उघडण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे.



पत्रात पुढे म्हटले आहे की, "अजिंठा आणि एलोरा लेणी २.५ किमी पसरलेल्या आहेत आणि भेट देणाऱ्या लोकांमध्ये योग्य सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. शॉपिंग मॉल्स आणि चित्रपटगुहांपेक्षा हे स्थळ नैसर्गिकरित्या हवेशीर आहे आणि त्यामुळे ५० टक्के पर्यटक उपस्थितीच्या क्षमतेने चालवण्यास सक्षम आहेत". सरकारच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांची मोठी गैरसोय झाली आहे. कारण, मार्च 2020 नंतर लेणी बंद करण्याची ही तिसरी वेळ आहे. "यामुळे औरंगाबाद आणि आसपासच्या पर्यटनावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून असलेल्या सर्वांचेही मोठे आर्थिक नुकसान होईल", अशी माहिती ठाकरे यांना देण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@