कोरोनामुळे देशात मृत्यू पडलेल्या ३०% लोकांचा मृत्यू एकट्या महाराष्ट्रात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2021
Total Views |
corona _1  H x



मुंबई -
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे भारतात आतापर्यंत ४ लाख १३ हजार ९६० मृत्यू झाले आहेत. यापैकी ३० टक्क्यांहून अधिक लोकांनी एकट्या महाराष्ट्रात आपला जीव गमावला आहे. या साथीमुळे महाराष्ट्रात १ लाख ३८ हजार २७७ लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
 
कोरोना संसर्गाशी संबंधित आकडेवारी
आकडेवारी दाखवते की कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली आणि केरळ या राज्यांमध्येही कोरोना संसर्गामुळे मृतांची संख्या वाढली आहे. देशाच्या बहुतांश भागात हा साथीचा रोग मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात आहे. परंतु, केरळमध्ये प्रकरणे सातत्याने वाढत आहेत, जी अतिशय चिंताजनक बाब आहे.
 
 
 
केरळमधील प्रकरणे
सध्या केरळमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर कमी झाला आहे. असे असूनही, संक्रमणाच्या नवीन प्रकरणांमध्ये केरळ हा भारतात दुसऱ्या स्थानी आहे. केरळमध्ये सध्या संक्रमण दर १६.५ टक्के आहे. याचा अर्थ केरळमध्ये प्रत्येक १०० चाचण्यांमागे १७ लोकांना संसर्ग होत आहे.
 
जर आपण कोरोना संक्रमणाची एकूण प्रकरणे पाहिली, तर महाराष्ट्रात ६६ लाखांहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. जी देशातील सर्वाधिक आहे. त्यानंतर केरळमध्ये ४४ लाखांहून अधिक प्रकरणे आहेत. यापूर्वी ऑगस्टमध्ये केरळमध्ये केवळ पाच दिवसांत विक्रमी १.५ लाख नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली होती. आकडेवारी दर्शवते की, केरळमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत, तरीही केरळचे कोविड -19 'व्यवस्थापन' राष्ट्रीय मुख्य प्रवाहातील माध्यमांसह तसेच काही आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून सातत्याने कौतुक केले जात आहे. आतापर्यंत भारतातील एकूण सक्रिय कोरोना प्रकरणांपैकी ५६ टक्क्यांपेक्षा जास्त केरळमधील आहेत.
 
सोमवारी, केरळने कोरोना मृत्यूंच्या बाबतीत उत्तर प्रदेशला मागे टाकत सर्वाधिक मृत्यू होणारे पाचवे राज्य बनले. बुधवारी केरळमध्ये २५,५८८ रुग्ण बरे झाले, तर १७,६८१ नवीन प्रकरणे नोंदली गेली. बुधवारीच, केरळमध्ये कोरोनामुळे २०८ लोकांचा मृत्यू झाला, जे भारतात सर्वाधिक आहे. संपूर्ण देशात कोरोनाची ३ लाख ३६ हजार ००७ सक्रिय प्रकरणे आहेत, त्यापैकी १ लाख ९० हजार ७९० सक्रिय प्रकरणे एकट्या केरळमधील आहेत.
@@AUTHORINFO_V1@@