धारावीच्या मोहम्मद शेखनं रचला होता मुंबई लोकल उडवण्याचा कट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2021
Total Views |

lOCAL _1  H x W
 
मुंबई : देशातील दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानातून मोठा कट रचला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पाकिस्तानातून शिजवल्या जाणाऱ्या हा नापाक कट दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेशच्या एटीएसनं मिळून उघड केला आहे. या प्रकाराचे अंडरवर्ल्ड कनेक्शन दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने वेळीच उघड केले आणि देशाला मोठ्या संकटापासून वाचवले आहे.
 
 
दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली. या दहशतवाद्यांच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर मुंबई शहर असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. मुंबई लोकलला टार्गेट करण्याचा त्यांचा इरादा होता, त्यासाठी दहशतवाद्यांपैकी काही जणांनी मुंबई लोकलची रेकी केली होती, अशी माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांमध्ये मुंबईच्या जान मोहम्मद शेखचाही समावेश आहे. जान मोहम्मद धारावीत राहातो, अशीही माहिती उघड झाली.
 
 
या कारवाईदरम्यान, दोन्ही दहशतवाद्यांव्यतिरिक्त, आणखी चार लोकांना व एकूण सहा लोकांना अटक करण्यात आली. त्यांना दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून पकडण्यात आले आहे. सण-उत्सवाच्या काळात दहशतवादी हल्ले करण्याचा या सर्वांचा डाव होता. ‘आयएसआयएस’पासून ‘अल कायदा’पर्यंत सर्वच दहशतवादी संघटना एकत्रितरीत्या हल्ले करणार होत्या. पण, त्याआधीच त्यांच्या नापाक मनसुब्यांवर पाणी फेरण्यात दिल्ली पोलिसांनी यश मिळवले.
@@AUTHORINFO_V1@@