"आंदोलनामुळे पंजाबचे नुकसान होतंय, तुम्ही दिल्लीत जा," काॅॅंग्रेसी मुख्यमंत्रीच शेतकरी आंदोलकांवर बरसले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2021
Total Views |
punjab_1  H x W



पंजाब -
सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतकरी संघटनांना पंजाबऐवजी देशाच्या राष्ट्रीय राजधानीत म्हणजेच दिल्लीमध्ये आंदोलन करण्यास सांगितले. सिंग यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला.
 
 
 
सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनांविषयी बोलताना कॅप्टन सिंग यांनी आंदोलकांवर पंजाबचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवला. “मला पंजाबच्या शेतकऱ्यांना सांगायचे आहे की, ही त्यांची जमीन आहे. त्यांचे याठिकाणी सुरू असलेले आंदोलन राज्याच्या हिताचे नाहीत,”. असे म्हणताना सिंग यांनी शेतकऱ्यांना दिल्लीवर हल्ला करण्यास प्रवृत्त केले आहे. "राज्यात आंदोलने करण्याऐवजी शेतकर्‍यांनी शेतीविषयक कायदे रद्द करण्यासाठी केंद्रावर दबाव आणला पाहिजे," ते पुढे म्हणाले. “जर पंजाबमध्ये शेतकऱ्यांना थांबवले गेले असते, तर ते सिंगू आणि टिक्री सीमेवर पोहोचले नसते. तुम्हाला हरियाणा आणि दिल्लीमध्ये जे हवे आहे ते करा पण तुम्ही पंजाबचे नुकसान का करीत आहात? ” असा सवाल त्यांनी शेतकरी आंदोलकांना विचारला. पंजाबमध्ये ११३ ठिकाणी आंदोलने करून शेतकऱ्यांनी राज्यातील विकासात अडथळा आणल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
 
 
 
अलीकडेच, जेव्हा पंजाबमधील पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला आणि पाण्याच्या तोफांचा वर्षाव केला, तेव्हा अमरिंदर सिंग हे हरियाणाचे मुख्यमंत्री एमएल खट्टर यांना कर्नालमध्ये आंदोलन करणाऱ्या जमावांवर कठोर कारवाईसाठी आवाहन करताना दिसले.यापूर्वी जुलैमध्ये पंजाबचे माजी काँग्रेस अध्यक्ष सुनील झाकर यांनी कबूल केले होते की, पंजाबचे मुख्यमंत्रीच शेतकऱ्यांना दिल्लीला जाऊन आंदोलन करण्यास प्रवृत्त करत होते. पंजाब काँग्रेसचे प्रमुख म्हणून नवज्योतसिंग सिद्धू यांच्या उद्घाटनप्रसंगी झाकर बोलत होते. “भाजपचे नेते त्यांच्या घरात लपून बसले आहेत. जर कॅप्टन अमरिंदर यांनी त्यांना योग्यरित्या हाताळले नसते आणि या शेतकऱ्यांना भाजपच्या विरोधात दिल्लीला पाठवले नसते तर आम्हाला पंजाबमधील त्यांच्या आणि त्यांच्या रागाला सामोरे जावे लागले असते. आमच्या मुख्यमंत्र्यांची ही सर्वात मोठी कामगिरी आहे,” असा त्यांनी खुलासा केला होता.
 
 
@@AUTHORINFO_V1@@