"आता जेवढ उडायचं तेवढा उडून घे, २०२४ला तुला औकात दाखवू"

29 Jul 2021 19:01:40

Nilesh Rane_1  
 
 
मुंबई : नुकतेच शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबीयांवर टीका केली. त्यांनी महाराष्ट्रात राणेंच्या मुलांसारखी मुले कोणाच्याही पोटी जन्माला येऊ नयेत, अशी टिप्पणी केली. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी सडेतोड उत्तर देत, "भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ, आता जेवढं उडायचय तेवढं उडून घे." असे म्हणत भास्कर जाधव यांच्यावर सणसणीत टीकास्त्र सोडले आहे.
 
 
 
 
 
 
भाजप नेते निलेश राणे यांनी म्हंटले आहे की, " भास्कर जाधव तुझी औकात २०२४ला तुला दाखवून देऊ, आता जेवढे उडायचय तेवढे उडून घे. वाळू चोर भास्कर जाधव तुझ्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाही. कुत्र्यासारखे भुंकत बसणे आणि समाजाला काही न देता नुसते रडत बसणे हे तुझे राजकारण लवकरच संपणार." असे म्हणत त्यांनी भास्कर जाधव यांना टोला लगावला.
 
 
 
 
 
 
पुढे त्यांनी म्हंटले आहे की, "स्वतःच्याच गावच्या मंदिरात गावकऱ्यांना शिवा घालणारा, मदत मागायला आलेल्या महिलेला मारायला जाणारा, स्वतःचा एकही रुपया चिपळूण शहराच्या विकासासाठी न वापरणारा भास्कर जाधव याने दुसऱ्याच्या संस्कृतीबद्दल बोलू नये. भास्कर जाधवने एक वस्तू दाखवावी जी त्याने कोकणाला स्वखर्चातून दिली." असे टीका केली आहे.
 
 
 
शिवसेना नेते भास्कर जाधव हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि कृत्यांमुळे चर्चेत येतात. आताही त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत कोकण दौऱ्यावर असताना एका महिलेवर हात उचलल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यामुळे एकीकडे कोकण आपत्तीमुळे संकटात असताना दुसरीकडे त्यांनी केलेल्या या कृत्यामुळे टीकेचे धनी ठरले.
 
 
Powered By Sangraha 9.0