टी-२०चे कर्णधारपद आता रोहित शर्माला द्या : माँटी पानेसर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2021
Total Views |

India_1  H x W:
 
मुंबई : नुकतेच भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करला आणि न्यूझीलंडने हे शीर्षक स्वतःच्या नावावर केले. यावरून आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या टीकेचा धनी ठरला आहे. अनेकांनी त्याच्या कर्णधार पदावर प्रश्नचिन्ह उभे करत त्याने हे पद सोडून द्यावे अशी मागणी केली आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू माँटी पानेसर यानेदेखील 'विराटऐवजी रोहित शर्माला टी - २० संघाचा कर्णधार करा,' असा सूर लावला आहे.
 
 
 
आगामी टी - २० विश्वचषक स्पर्धेचा विचार करत पानेसरने सांगितले की, "रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे. तसेच विराट कोहली सध्या दबावात आहे. इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका आणि आगामी टी- २० विश्वचषक दबाव कोहलीवर आहे. भारतीय संघाने या दोन्ही स्पर्धेत चांगली कामगिरी केली नाही तर त्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला माहिती आहे." असा सल्ला त्याने दिला आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@