पवार म्हणाले! ठाकरेंना मुख्यमंत्री करून मोठी चूक केली ?

    08-May-2021
Total Views | 44198

sharad pawar _1 &nbs
 
 
मुंबई : महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेल्या शरद पवारांचाच फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून सर्वात मोठी चूक केल्याची भावना शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे बोलताना व्यक्त केली, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी केला आहे.
 
 
'एकनाथ शिंदे किंवा संजय राऊत यांना मुख्यमंत्री बनवलं असतं तर परवडलं असतं', असे हतबलतेने पवार राऊतांपुढे व्यक्त झाल्याचा गौप्यस्फोट अनिल थत्ते यांनी केला. पाच राज्यांच्या निवडणूक निकालादरम्यान दै.'मुंबई तरुण भारत व सा.विवेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पश्चिम बंगाल ते पंढरपूर' या चर्चासत्रात ते बोलत होते.
 
 
 
थत्ते म्हणाले की, "बाळासाहेबांनी स्वबळावर सत्ता आणली नाही, शरद पवार हे कधी महाराष्ट्राचे ममता बॅनर्जी होऊ शकले नाहीत. उद्धव ठाकरेंना ते शक्यच नाही. शरद पवारांनी आयुष्यभरात कधी ५२-५५ आमदारांच्या पुढे सत्ता आणली नाही. शिवसेनेला ते शक्य नाही आणि ममता बॅनर्जीं महाराष्ट्रात येऊन त्यांच्या तारणहार बनतील, अशी अपेक्षाही नाही."
 
 
"ममतांची राजकीय शैली महाराष्ट्राच्या पचनी पडणारी नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडे फडणवीसांच्या विरोधात उभा करण्यासाठी एकही सक्षम नेतृत्व नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये फाटाफूट अटळ आहे ती लवकरच होईल, शिवसेनेतच अनेक जण नाराज आहेत. सेना आतून पोखरली गेली आहे. पक्षांतर्गत खदखद आहे.", असा दावाही थत्तेंनी केला आहे.
 
 
ऐका राजकीय थत्ते!
 
महाMTB आणि सा.विवेक आयोजित विशेष मुलाखतीत ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी आपल्या खास शैलीत राज्यातील राजकारणातील परिस्थितीवर परखड भाष्य केले आहे. ही संपूर्ण UNCUT मुलाखत लवकरच दै.मुंबई तरुण भारतच्या ऑनलाईन वेब पोर्टल 'महाMTB'वर प्रसिद्ध केली जाईल. मुलाखत पाहण्यासाठी युट्यूब चॅनल आणि फेसबूक पेजला नक्की लाईक करा....


अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121