राज्य सरकारकडून जनतेची घोर फसवणूक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2021
Total Views |

केशव उपाध्ये पत्रकारपरिषद


मुंबई :
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांच्या नावाखाली राज्य सरकारने लॉकडाऊन लावत जनतेची घोर फसवणूक केली आहे. रोज बदलणारे नियम ,मंत्र्यांची परस्पर विरोधी विधाने पाहता राज्य सरकारची परिस्थिती "कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं” अशी झाली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी ७ एप्रिल रोजी केली. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कठोर निर्बंध की लॉकडाऊन ?


उपाध्ये म्हणाले की, राज्यातकठोर निर्बंध लावले जाणार असून प्रत्येक आठवड्यात शनिवारी व रविवारी पूर्ण लॉकडाऊन असेल असे सरकारमधील चार-चार मंत्र्यांनी विविध वृत्तवाहिन्यावर सांगितले होते. जनतेच्या हिताचा सारासार विचार करून हा निर्णय घेतला असल्याचेही या मंत्र्यांनी आवर्जून सांगितले होते. मात्र, मंगळवारी राज्यभरातली गोंधळाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने विरोधी पक्षांसह जनतेची सुद्धा फसवणूक केल्याचे दिसून आले. पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात बाजारपेठा, दुकाने बंद केल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारला कठोर निर्बंध लावायचे आहेत की लॉकडाऊन ?असा सवाल उपाध्ये यांनी उपस्थित केला.


संकटकाळात भाजप सरकारसोबत मात्र सर्वसामान्यांना दिलासा द्या.



ते पुढे म्हणाले की, राज्यावरील कोरोनाचे संकट टळण्यासाठी राज्यातील जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भाजप सरकारसोबत आहे. मात्र, सरकारने सामान्य, गोरगरीब, कष्टकरी वर्गाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने या वर्गाला आर्थिक मदत द्यावी असे भाजपने सुचवले होते. तरीही रविवारी आपला निर्णय जाहीर करून मुख्यमंत्री ‘मातोश्री’त बसले आहेत. या संकटकाळात सामान्य जनतेचे काय ? हा साधा प्रश्नही त्यांना पडत नसावा का ? सरकार एवढे निर्दयी कसे असू शकते? असा सवालही उपाध्ये यांनी उपस्थित केला.

कठीण काळात सरकारने वीज बिलांची वसूली थांबवा 


तसेच उपाध्ये म्हणले की, राज्यातले अर्थचक्र गतिमान करण्याच्या गप्पा मारणाऱ्या या वसूली सरकारने अप्रत्यक्ष लॉकडाऊन लावून अर्थव्यवस्थेचे चक्र पूर्णत: ठप्प केले आहे. तसेच या कठीण काळात सरकारने वीज बिलांची वसूली थांबवण्याचा निर्णय घेणे अपेक्षित होते मात्र सरकारने त्याकडेही दुर्लक्ष केले आहे. केवळ जनतेची पिळवणूक हेच या सरकारचे धोरण आहे हे आता स्पष्ट होत आहे, असे म्हणत केशव उपाध्ये यांनी सरकारवर सडकून टीका केली.

संघनिष्ठ शोधण्याऐवजी 'वाझे' शोधा


नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गृहखात्याचा कारभार स्वीकारताच गृह खात्यातील संघनिष्ठ अधिकारी शोधण्याचे जाहीर केले. संघ देश प्रेम शिकवतो. संघनिष्ठ अधिकारी शोधण्यास वेळ घालविण्यापेक्षा विविध खात्यात भ्रष्ट व्यवहार करणारे जे ‘वाझे’ अद्याप दडलेले आहेत त्यांना शोधून काढावे , ते महाराष्ट्राच्या हिताचे आहे, असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला.
@@AUTHORINFO_V1@@