देशातील ग्रामीण भागात एकुण १९ कोटी १९ लाख १२ हजार ५२० घरे आहेत. त्यापैकी २०१९ पर्यंत म्हणजे जल जीवन मिशनची घोषणा होईपर्यंत ३ कोटी २३ लाख ६२ हजार ८३८ म्हणजे जवळपास १७ टक्के घरांपर्यंत नळावाटे शुद्ध पिण्याची पाणी पुरविले जात होते. या योजनेची घोषणा झाल्यापासून म्हणजे १५ ऑगस्ट, २०१९ ते आजपर्यंत म्हणजे ३० मार्च २०२१ पर्यंत ७ कोटी २४ लाख ९७ हजार ६४३ घरांपर्यंत (३७.७८ टक्के) नळावाटे पाणीपुरवठा करण्यात यश आले आहे. म्हणजेच गेल्या २ वर्षांत तब्बल ४ कोटींहून अधिक ग्रामीण घरांमध्ये नळावाटे शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. करोना संसर्गासारख्या संकटाच्या काळातही घरामंध्ये नळजोडणी करण्याचे काम थांबले नाही, सध्या दरदिवशी १ लाख घरांमध्ये नळजोडणी देण्याची काम यशस्वीपणे केले जात आहे.
देशात गोव्याने आपल्या राज्यातील १०० टक्के ग्रामीण घरांमध्ये नळावाटे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यश मिळविले आहे. गोव्यापाठोपाठ तेलंगाणा आणि अंदमान निकोबार द्विपसमुह योजनेची अंमलबजावणी करण्यात आघाडीवर आहेत. या प्रदेशातील ५६ जिल्ह्यांमधल्या ८६ हजारांहून अधिक गावांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबास पाणीपुरवठा होत आहे. महाराष्ट्रातील १ कोटी ४२ लाख ३६ हजार १३५ घरांपैकी आतापर्यंत ९० लाख ७० हजार ००२ म्हणजेच ६७.७१ टक्के घरांमध्ये या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे.
जलजीवन मिशनमुळे देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनात मोठे परिवर्तन होत आहे. कारण, अशुद्ध पाणी प्यायलामुळे अनेक रोगांचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे दूरवरून पाणी वाहून आणावे लागत असल्याने आरोग्यावरही घातक परिणाम होतो. मात्र, आता या योजनेला मिळत असलेल्या यशामुळे ग्रामीण भारताचा चेहरामोहरा नक्कीच बदलणार आहे.
दुर्गम भागातही २४ तास पाणीपुरवठा