बांग्लादेशात हिंदूंच्या गावावर कट्टरतावाद्यांचा हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2021
Total Views |

hh_1  H x W: 0



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्लादेश दौऱ्याच्या अगोदरच बांग्लादेशात हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे. मुस्लिम कट्टरतावादी संघटना हिफाजत ए इस्लामच्या कार्यकर्त्यांनी अल्पसंख्य हिंदूंच्या गावावर सशस्त्र हल्ला करून जवळपास ८० घरांची जाळपोळ आणि तोडफोड केली आहे.
 
 
यामुळे पंतप्रधान मोदींनी लागू केलेल्या सुधारित नागारिकत्व कायद्याचे (सीएए) महत्व अधोरेखित झाले आहे, अशी प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशांच्या परस्परसंबंधांना मजबूत करण्यासाठी हा दौरा महत्वाचा ठरणार आहे. मात्र, त्यापूर्वीच बांग्लादेशात अल्पसंख्यांक असणाऱ्या हिंदू समुदायाचे जगणे मुश्कील झाल्याचे पुढे आले आहे.


HEI_1  H x W: 0
 
 
 
हिंदूंची उध्वस्त घरे आणि मनेही...
 
 
बांग्लादेशात मौलाना मुफ्ती मामूनल याने बांग्लादेशाचे निर्माते वंगबंधू शेख मुजीबुर रहेमान यांची प्रतिमा लावण्यास विरोध केला होता. त्यांच्याविरोधात मुस्लिमांनी एकत्र यावे, असेही आव्हान या मौलानाने केले होते. त्याविरोधात शल्ला उपजिला येथील एका हिंदू युवकाने फेसबुक या समाजमाध्यमावर एक पोस्ट टाकली होती. त्यामध्ये वंगबंधूंच्या प्रतिमेस विरोध करणाऱ्या मौलाना मामूनलवर टिका करण्यात आली होती.
 
त्यावर हिफाजत ए इस्लाम या संघटनेचे शेकडो कार्यकर्ते शस्त्रांसह नागांव या हिंदूंची वस्ती असणाऱ्या गावावर चालून गेले. त्यांनी हिंदूंवर हिंसक हल्ले चढविले आणि घरांची नासधूस केली. यामध्ये सुमारे ८० घरांमध्ये लूटमारही करण्यात आली आहे. यामुळे गावातील हिंदूंना आपले घरदार सोडून जीव वाचविण्यासाठी पलायन करावे लागले आहे, अशी माहिती तेथील हबीबपूर युनियनचे अध्यक्ष विवेकानंद मजुमदार बाकुल यांनी दिली आहे.
 
 
 
 

vb_1  H x W: 0  
 
 
 
 
‘सीएए’विरोधी कथित सेक्युलरांनी आता बोलावे : विनोद बन्सल 
 
 
पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान या मुस्लिम राष्ट्रांतील हिंदू, जैन, शिख, बौद्ध आदी अल्पसंख्यांकाना भारतात आश्रय आणि नागरिकत्व देण्यासाठी मोदी सरकारने सीएए मंजुर केला. त्याविरोधात जिहादी मुस्लिमांची साथ देणाऱ्या देशातील कथित सेक्युलरांनी अपप्रचार केला होता.  मात्र, आता बांग्लादेशातील या घटनेमुळे मुस्लिम राष्ट्रांमध्ये अल्पसंख्य हिंदूचा जीव धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता हिंदूंच्या जीवाचे मोल नसणाऱ्या, दहशतवाद्यांची मदत करणाऱ्या भारतातील राजकीय पक्षांनीही आपली भूमिका स्पष्ट करावी.



@@AUTHORINFO_V1@@