राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मोदींचा धन्यवाद प्रस्ताव
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर उत्तर दिले. ते म्हणाले, "आदरणीय सभापती महोदय संपूर्ण जग आता समस्यांचा सामना करत आहे. कोणी विचार केला नसेल की या संकटातून पुढे जावे लागेल. या दशकाच्या प्रारंभी राष्ट्रपतींनी संयुक्त सदनात जे उद्बोधन केले. हे अभिभाषण नवा विश्वास निर्माण करणारा होता. आत्मनिर्भर भारताच्या आगामी वाटचालीची चुणूक दाखवणारे हे अभिभाषण होते.
ते म्हणाले, "राज्यसभेत तब्बल १३-१४ तास आपला बहुमूल्य आणि वेगवेगळ्या पैलूंचा विचार केला. त्या सर्वांचा मी आभारी आहे. राष्ट्रपतींच्या भाषणावेळी सर्वजण असते तर लोकशाहीची मान आणखी उंचावली असती. राष्ट्रपतींच्या भाषणाची ताकद इतकी होती की कित्येकजण न ऐकतासुद्धा त्यावर बोलू शकले."
कवितेतून विरोधकांवर निशाणा
ते म्हणाले, "स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात आपण प्रवेश करत आहोत. हे पर्व काहीसा स्वाभीमान जागृत करणारे आहे. आपल्याला विचार केला पाहीजे की देशाच्या स्वातंत्र्याच्या शंभराव्या म्हणजे २०४७ वर्षापर्यंत आपण कुठे असू. आज जगाच्या नजरा आपल्याकडे आहेत. मी या प्रसंगी चर्चा करतो तेव्हा मला मैथिलीशरण गुप्त यांची एक कविता आठवते. "अवसर तेरे लिए खड़ा है, फिर भी तू चुपचाप पड़ा है। तेरा कर्मक्षेत्र बड़ा है, पल-पल है अनमोल, अरे भारत उठ, आंखें खोल", असे म्हणत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. २१ व्या शतकात ते काय लिहीतील याचा मी विचार करत होतो. तूमचा आत्मविश्वासाने भरलेले आहात. प्रत्येक संकटे, अडचणींवर मात करून भारत आत्मनिर्भरतेच्या मार्गावर धावू शकतो.
जग आपल्या प्रयत्नांचे कौतूक करत आहे.
मोदी म्हणाले, "कोरोना दरम्यान, कुणी कुणाची मदत करेल हे अशक्य झाले होते. एक देश दुसऱ्या देशाला एक प्रदेश दुसऱ्या प्रदेशाला मदत करू शकत नव्हता. कोट्यवधी जीव आपण गमावले होते. कोरोना एक अदृश्य शत्रू मानला जात होता. यातून मार्ग कसा काढायचा, मात कशी करायची याचा विचार कुणीही करू शकत नव्हता. लोकांना वाचवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लाहणार होता. या संकटताळात आपल्याला ईश्वराचे पाठबळ मिळाले. बुद्धी सामर्थ्य दिले. आपण या संकटावर मात करू शकलो, जगाने आपल्या स्फूर्तीचा गौरव केला."
देशाचे मनोबल तोडणाऱ्या भाषणांमध्ये अडकू नका !
सोशल मीडियावर आपण पाहिले की, पदपथावर एक वृद्ध माता दिवा लावून बसली होती. आपण या गोष्टीची थट्टा केली. मात्र, ज्या माऊलीने शाळेचा दरवाजा पाहिला नाही. तिने सामूहिक शक्तीचा परिचय पाहिला. मात्र, या गोष्टीची थट्टा करण्यात आली. विरोध करण्यासाठी कित्येक मुद्दे असतात. पण देशाचे मनोबल तोडण्याच्या गोष्टींमध्ये अडकू नको. कोरोना योद्ध्यांनी ज्या संकट काळात आपल्याला सावरले. त्यांचा आदर करायलाच हवा. देशाने हा सन्मान राखला.
कोरोना लसीचा उल्लेख
मोदी म्हणाले, "ज्या देशाला तिसरी दुनिया म्हटले जात होते. तो देश या क्षणाला कोरोना लसीच्या निर्मितीत गुंतला आहे. सहाजिकच आहे भारतीय म्हणून आपल्याला गर्व असायलाच हवा. इतक्या कमी वेळात कोरोना लस निर्माण केली याचा आम्हाला अभिमान आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात राबवली जात आहे. आज कोरोना लसीच्या माध्यमातून आपण नवी मैत्रीच्या द्वारे खुली केली आहेत. कित्येक देश म्हणत आहेत कि आमच्याकडे भारताची कोरोना लस आली आहे. लोक जेव्हा परदेशात शस्त्रक्रियेसाठी जातात तेव्हा भारतीय डॉक्टर आहेत की नाही हे तपासून पाहतात. ही गोष्ट पाहिल्यावर आमच्याही डोळ्यात चमक येऊ लागली आहे. हीच आपली कमाई आहे."
राज्यांना दिली साद
कोरोना काळात देशाने एक होऊन ज्या प्रमाणे काम केले त्याच प्रमाणे राज्य व केंद्राने मिळून काम पहायला हवे. मी याबद्दल सर्वांचा आभारी आहे. लोकशाहीबद्दलही कित्येक गोष्टी बोलल्या गेल्या. मी असे मानत नाही की लोकशाहीबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अपप्रचाराला आम्ही बळी पडणार नाही. नागरिक म्हणून देशाच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवा.
एमएसपी कायम राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलकांना आश्वस्त करत चर्चेसाठी आपण मार्ग मोकळा ठेवला असल्याचे सांगितले आहे. शेतकरी नेत्यांना त्यांनी चर्चेसाठी या असे आवाहन केले. तसेच हमीभाव पद्धती कायम राहणार असल्याचेही राज्यसभेत सांगितले.
अर्थसंकल्पात ८२.१० टक्क्यांनी वाढेल 'प्रोडक्टिविटी'
सरकारच्या मते, अर्थसंकल्पामुळे ८२.१० टक्क्यांनी आपली उत्पादनक्षमता वाढेल. बैठकीचा संपूर्ण समय २० तास ३४ मिनिटे सुरू होता. ३ फेब्रुवारी रोजी विरोधी पक्षामुळे ४ तास १४ मिनिटे वेळ वाया गेला. त्यामुळे खासदारांना ३३ मिनिटे वेगळा वेळ बसावे लागले होते.