शास्त्री-कोहली जोडीचा आजचा अखेरचा सामना

08 Nov 2021 14:32:07
kohli shastri_1 &nbs
 




दुबई
: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहली सोमवारी त्याच्या कर्णधारपदावर अखेरचा सामना टी-२० वर्ल्ड कप सामन्यात खेळणार आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचा कोच म्हणून शेवटचा सामना असेल. अश्यारीत्या, भारतीय क्रिकेट विश्वात शास्त्री-कोहली युग संपुष्टात येणार असल्याची चर्चा क्रीकेटप्रेमींमध्ये आहे.



टी-२० मध्ये भारतीय संघाचा हा शेवटचा सामना नामिबिया विरुद्ध असेल. हा सामना जिंको किंवा हरो टीम इंडिया रविवारीच अफगाणिस्तानच्या पराभवासह विश्वचषकातून बाहेर झाली आहे. रविवारी अफगाणिस्थान विरुद्ध झालेल्या सामना झाल्यानंतर भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर झाला. पत्रकार परिषदेत विराट कोहलीने स्पष्ट केले होते कि, हा सामना त्याच्यासाठी संघाचा कर्णधार म्हणून आणि टी-२० तील अखेरचा सामना असेल.. तेच, रवी शास्त्रीही त्यांच्या प्रशिक्षकाच्या सेवेतून निवृत्ती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.  
 


क्रिकेट विश्वातले हे दोन दिग्गज त्यांचा शेवटचा सामना नक्कीच रंजक खेळवण्याचा प्रयत्न करतील. मात्र, क्रिकेट प्रेमी नक्कीच हळहळ व्यक्त करतील कि, कोहली-शास्त्री एकत्र असताना त्यांनी कुठलेही विशेष विक्रम रचले नाहीत. रवी शास्त्री २०१७ पासून भारतीय संघाचे प्रशिक्षक आहेत. 
Powered By Sangraha 9.0