या शहरांमध्ये कचरा डेपोत येणाऱ्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे पुनर्वापर करण्यात येत आहे. नगरपरिषदेमार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते. त्याचबरोबर शासनाच्या 'हरित ब्रॅण्ड' अंतर्गत शेतकऱ्यांसाठी हे खत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सोबतच हागणदारी मुक्त गाव योजनेअंतर्गत 600 लाभार्थींना वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात आली आहेत. सासवड नगरपरिषदेने तर शहरात 6 हजारहून अधिक वृक्षांची लागवड व जोपासना केलेली आहे. प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने सणांच्या दिवसांमध्ये पर्यावरणपूरक मुर्ती निर्माल्य संकलन कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत. या प्रकारच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे या शहरांना महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते ''सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज पुरस्कार'' देऊन गौरविण्यात येणार आहे.