जय श्री रामचा नारा देणारे सगळे राक्षस - काॅंग्रेस नेते राशिद अल्वी

12 Nov 2021 16:14:59
congress_1  H x



लखनऊ -
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद सुरूच आहे. दरम्यान, काँग्रेसचे आणखी एक नेते रशीद अल्वी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू झाला आहे. वास्तविक अल्वी उत्तर प्रदेशातील संभल येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. याठिकाणी बोलताना त्यांनी रामाच्या बहाण्याने भाजपवर निशाणा साधला. रामायणाचा एक प्रसंग सांगताना त्यांनी जय श्री राम म्हणणाऱ्यांची तुलना राक्षसाशी केली.




अल्वी म्हणाले, 'जय श्री रामचा जप करणारे सर्व ऋषी नाहीत, ते निशाचर आहेत. त्यामुळे आपण हुशार असणे आवश्यक आहे." अल्वी यांच्या या वक्तव्यावर भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी अल्वी यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर केला असून सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता रशीद अल्वी जय श्री राम म्हणणाऱ्यांना निशाचर (राक्षस) म्हणत आहेत.



अल्वी म्हणाले - काही लोक श्रीरामाचे नाव राक्षसासारखे घेत आहेत

वास्तविक, सलमान खुर्शीद यांनी भाजपच्या काही लोकांकडे बोट दाखवत जय श्री रामचा नारा देणाऱ्यांची तुलना रामायणातील कालनेमी राक्षसाशी केली. अल्वी म्हणाले की, लक्ष्मण जेव्हा बेशुद्ध पडले होते, तेव्हा वैद्य यांच्या सांगण्यावरून हनुमानजी हिमालयातून संजीवनी औषधी घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी कालनेमी राक्षस खाली बसून जय श्री रामाचे नामस्मरण करत होता. हे ऐकून हनुमानजी खाली आले. त्यांचा मौल्यवान वेळ वाया घालवण्यासाठी त्या राक्षसाने हनुमानजींना जय श्री राम म्हणण्यापूर्वी स्नान करायला पाठवले होते. त्या राक्षसाप्रमाणे काही लोक आजही भगवान श्रीरामाचे नामस्मरण करत असल्याचे, अल्वी म्हणालेे. आम्हालाही देशात रामराज्य हवे आहे, पण ज्या राज्यात बकर्‍या आणि सिंह एकाच घाटावर पाणी पितात तेथे द्वेष कसा असू शकतो, असे अल्वी यांनी म्हटले आहे. जय श्री रामचा जयघोष करून लोकांची दिशाभूल करणाऱ्यांनी सावध राहावे, असे अल्वी म्हणाले.


सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना इसिसशी केली

अल्वी यांच्या वक्तव्यापूर्वी काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या 'सनराईज ओव्हर अयोध्या' या पुस्तकावरुन गदारोळ सुरु आहे. खरे तर खुर्शीद यांनी या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केली आहे. खुर्शीद यांचे पुस्तक बुधवारी लाँच करण्यात आले आणि २४ तासांत त्यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी विवेक गर्ग नावाच्या वकिलाने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे गुन्हा नोंदवण्याची विनंती केली आहे. खुर्शीद यांच्यावर हिंदुत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्याचवेळी भाजपने सोनिया आणि राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावर हे होत असल्याचं म्हटलं आहे. ...

Powered By Sangraha 9.0