वानखेडेंच्या प्रतिज्ञापत्राबद्दल जयंत पाटील म्हणाले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2021
Total Views |

Jayant patil _1 &nbs



ठाणे : "प्रभाकर साईल याने एनसीबी व समीर वानखेडे यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. हे सर्व धक्कादायक आहे. बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. ईडी, सीबीआय, आयटी या यंत्रणा कमी पडल्यामुळे आता एनसीबी ॲक्टीव झालेली दिसते," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ठाणे येथे पत्रकार परिषदेत केला.
 '
 
 
"सरकार अस्थिर करण्याचा पूर्ण प्रयत्न झाला. शेवटी सरकार पडत नाही म्हटल्यावर सरकार व मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आणि त्यातीलच एक आर्यन खान प्रकरण असल्याचे जयंत पाटील म्हणाले. आर्यन खान प्रकरणात काही बाबी नवाब मलिक यांनी पुराव्यासहीत उघड केल्या आहेत. समीर वानखेडे यांचे जन्म प्रमाणपत्र प्रसारीत केले आहे. त्यावरून समीर वानखेडे यांनी मागासवर्गीय असल्याचे दाखवून फायदा मिळवला असल्याचे दिसत आहे," असे जयंत पाटील म्हणाले.


@@AUTHORINFO_V1@@