अंत्यसंस्कारावेळीच काळाचा घाला ; १०हून अधिक ठार

03 Jan 2021 17:03:42

ghaziabad_1  H
 
 
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गाझीयाबादमध्ये निर्माणाधीन भिंत कोसळून १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मलब्याखाली आणखी लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गाझियाबादमधील मुरादनगर भागात एका स्मशानभूमीची भिंत बांधण्याचे काम सुरू होते. मात्र, अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांच्या अंगावर भिंत कोसळून अपघात झाला.
 
 
 
भिंतीखाली अडकलेल्या २० पेक्षा जास्त व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे. भिंतीखाली सापडल्याने अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पाऊस पडत असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.
Powered By Sangraha 9.0