'गरिबाला सरकारची कुठलीही मदत नाही, त्याच्यावर मरणाची वेळ'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2020
Total Views |

devendra fadnavis_1 


मुंबई :
राज्यातील कोरोनाची स्थिती, आरोग्यव्यवस्था, विदर्भातील पूर अशा अनेक जनहितांच्या प्रश्नांवर पुरवणी मागण्यांच्या चर्चेच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत बोलत होते. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंग प्रस्ताव आणि त्यावरील चर्चेला आक्षेप घेतला होता. ते म्हणाले, “काल ठरले की, सर्व विषयांवर चर्चा करायची आणि आज तीन वाजता मतदान आहे, हे गृहित धरून त्याच्याआधीचा वेळ गोंधळात कसा घालवायचा, याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. राज्य सरकार गंभीर नाही, हाच याचा अर्थ” अशी टीका फडणवीस यांनी सरकारवर केली.


यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले,"२४ मार्च रोजी गेल्या अधिवेशनाचा निरोप घेतला, तेव्हा रूग्णसंख्या २८ होती आणि आज ९.२५ लाख इतके सर्वाधिक पोलिस प्रभावित झाले आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांना संसर्ग होण्याचे प्रमाण सुद्धा महाराष्ट्रात अधिक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. देशातील एकूण मृत्यूंपैकी ३८ टक्के मृत्यू महाराष्ट्रात असून कोरोनामध्ये महाराष्ट्रात मृत्यूचे थैमान चालू आहे.अनेक शहरांमध्ये अतिशय भयावह स्थिती महाराष्ट्र अनेक क्षेत्रात नंबर १ पण, तो कोरोनात नंबर १ होऊ नये, अशी आमची अपेक्षा असल्याने त्यांनी सांगितले.


राज्यातील परिस्थिती वेगळी दाखवण्यात येत आहे ; सद्यस्थतीत मात्र वेगळी

फडणवीस म्हणाले, 'आम्ही कोरोनाची स्थिती काहीही दाखवत असू. पण चित्र वेगळे आहे. मुंबईत आपण ७५०० मृत्यू दाखवितो आहोत. पण, प्रत्यक्षात १५ हजार मृत्यू झाले आहेत.आपण संख्येशी लढतो आहोत, कोरोनाशी नाही." अशी टीका त्यांनी केली. असे म्हणत असतानाच घोषणा आणि जीआरमध्ये फरक असून राज्यात केवळ ९००० लोकांना महात्मा फुले जनारोग्य योजनेचा लाभ मिळाला आहे. गरिबाला कुठलीही मदत नाही, त्याच्यावर मरणाची वेळ आली आहे. राज्यात २० लाख रुपयांची बिलं लादली जात आहेत:ज्याच्या खिशात पैसे नाही, त्याला मरणासाठी सोडून देण्यात आले आहे. मालेगावात यावर्षी झालेले मृत्यू आणि गेल्यावर्षीचे मृत्यू यात तिपटीचा फरक. संख्या कमी करण्यासाठी सर्वांत मोठा प्रयत्न काय तर चाचण्या कमी करून टाकल्या बेड प्रचंड आहेत, असे सांगितले जाते. पण, तेथे कोणतीही व्यवस्था नाही.मरणाशिवाय या सरकारने कोणताही पर्याय ठेवला नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.


आज कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाहीत

मुंबईत चाचण्या कमी का ? असं सवाल फडणवीस यांनी केला. असे असताना रोग पसरतो, तर ते मान्य करावे लागेल. त्यावर उपाय करावा लागेल. लपवून काय साध्य होणार आहे असं प्रश्नही त्यांनी राज्य सरकारला केला. महाराष्ट्रात सातत्याने २० टक्के संसर्ग दर देशापेक्षा आणि अन्य राज्यांपेक्षा तो कितीतरी अधिक आहे. काल तर संसर्गाचा दर २५ टक्के असून ही स्थिती भयावह असल्याचे त्यांनी नमूद केले. जम्बो कोविड सेंटर आरोग्यासाठी की कुणालातरी लाभ देण्यासाठी? बीकेसीतील कोविड सेंटरमध्ये चाललं काय? अशा प्रश्न उपस्थित करत ३७ टक्के मृत्यूदर राज्यात आहे हा दर जगात कुठेही नाही. याकडे कोणाचे लक्ष्य आहे का ? याचा जाबही फडणवीस यांनी राज्य सरकारला केला.कोविड सेंटर हे मरणाचे आगार करू नका अशा सूचनाही त्यांनी राज्य सरकारला केल्या.मुंबई, पुणे महत्त्वाचे आहेच. पण औरंगाबाद, नाशिक, नागपूर हे महाराष्ट्रातच आहेत, हे सरकारला सांगावे लागेल काय.सरकारचा दिशा कायदा मंत्रिमंडळ बैठकीत कसा फिरला, हे आम्हाला ठाऊक आहे. पण आज कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाहीत .


विदर्भ-मराठवाड्यात नागरिक राहत नाही का? तेथे राहतात ते काय माणसं नाहीत काय?

विदर्भातील पूरस्थिती व नुकसान याबाबत बोलताना ते म्हणतात, विदर्भात पुराने मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणती दखल घेतली असेल तर दाखवा. मी स्वतः जाऊन आलो, अतिशय भीषण अवस्था आहे. दिले किती तर १६ कोटी रुपये.विदर्भ-मराठवाड्यात नागरिक राहत नाही का ?तेथे राहतात ते काय माणसं नाहीत काय? दुसर्‍या कोणत्याही शहरांना कोणतीही मदत का नाही? ६-६ महिने झाले. पण, शहरांना पैसा दिला जात नाहीये.राज्यकर्त्यांना केवळ लोकप्रिय निर्णय घेऊन चालत नसतात. समाजाच्या हिताचा विचार करायचा असतो. ती आपली जबाबदारी असते, असेही ते म्हणाले.


शेतकरी प्रश्न, राज्याची अर्थव्यवस्था व मोठी वीजबिले


शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले, बांधावर जाऊन खतं देऊ, असं सांगितलं. पण, प्रत्यक्षात बियाण्यांचा काळाबाजार करून बोगस बियाणं दिलं गेलं. अनेक ठिकाणी ३ वर्ष जुने बियाणं. त्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला. चांगला मान्सून येऊनही शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. सरकारची अर्थव्यवस्था चांगली नसेल तर काही खर्च टाळता आले असते. देशातील छोटी-छोटी राज्य निर्णय घेतात, अन महाराष्ट्रात एकही निर्णय होत नाहीत. बारा बलुतेदारांपैकी एकाही घटकासाठी निर्णय नाहीत.दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यांच्यासाठी कोणते निर्णय होत नाहीत.शेतकरी जगतो दुधावर. शेतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये दुधाचे योगदान. या सरकारने कुणालाच काही दिले नाही:वीज बिले प्रचंड आली आहेत. सामान्य माणूस सांगतो म्हणून ऐकायचे नसेल तर किमान सेलिब्रिटी सांगतात म्हणून तर कमी करा.


आजही मुंबई पोलिसांचा आम्ही सन्मान करतो. पण पोलिस भांडी धुण्याच्या कामाचे हे मुख्यमंत्री का बोलले?


आजही मुंबई पोलिसांचा आम्ही सन्मान करतो. पण पोलिस भांडी धुण्याच्या कामाचे हे मुख्यमंत्री का बोलले? आज माध्यमांच्या उल्लेखाबाबत बोलले जाते. पण ‘सामना‘ बाबत तीच भूमिका घ्याल का? पंतप्रधानाचा उल्लेख तेथे कसा केला जातो, हे सांगावे लागेल का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.मेट्रोचे काम बंद ठेवले तर दिवसाला ५ कोटी नुकसान झाले आहे.आम्ही त्यावेळी सर्व पर्याय पडताळून पाहिले. कोणताच पर्याय नसल्याने आरेची जागा अंतिम केली. वाढलेला खर्च, जागा खरेदीचा खर्च अन् भार पडणार सामान्य मुंबईकरांवर पडणार असल्याचेही फडणवीस यांनी दाखवून दिले. प्रत्येक प्रश्न प्रतिष्ठेचे करायचा नसतो असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
@@AUTHORINFO_V1@@