मुंबई : बाबरी प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. देशभरातून भाजप नेत्यांच्या यात प्रतिक्रीया येत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सत्याचा विजय झाल्याचे मत व्यक्त केले आहे. "बाबरी प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. सत्याचा आणि जनभावनेचा विजय आहे. राम जन्मभूमीवरचं शेवटचं वादळही आज शांत झालं. सर्वधर्मीय आदराने हा निकाल स्वीकारतील. तसेच कार्यकर्तें ही विनम्र आणि शांतपणे या निकालाचे स्वागत करतील.", असे प्रवीण दरेकर म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही या प्रकरणी न्यायालयाचे आभार मानले आहेत. बाबरी विध्वंस्त प्रकरणात लालकृष्ण आडवाणी, उमा भारती यांच्यासह ३२ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायप्रक्रीयेवर असलेल्या सर्वांच्या विश्वासाचा हा विजय आहे. हा सत्याचा विजय आहे, असे चंद्रकांतदादा म्हणाले.