नागपूर : सीबीआयच्या विशेष न्यायालयाने वादग्रस्त ढाँचा विध्वंस प्रकरणात दिलेल्या निकालाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. रा.स्व. संघाने देशवासीयांना एक संदेश दिला आहे. सर्वात आधी या प्रकरणात असलेल्या आरोपींना सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केल्याबद्दल रा.स्व.संघातर्फे सरकार्यवाह भय्याजी यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत.
भय्याजी जोशी
म्हणातात, "सीबीआय विशेष न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष व सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केल्याबद्दल रा.स्व.संघ या निर्णयाचे स्वागत करतो. या निर्णयानंतर देशातील सर्व समाज घटकांनी एकमेकांवर विश्वास दाखवत एकत्र येत देशासमोर येणाऱ्या देशाच्या प्रगतीसाठी झटले पाहिजे."