"उखाड दिया"ला 'सत्यमेव जयते'ने उत्तर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2020
Total Views |
Kangna Ranaut_1 &nbs

मुंबई : मुंबई महापालिकेने कंगना रणौतच्या कार्यालयातील बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. न्यायालयात उत्तर दाखल करण्यास अजूनही पालिका आणि खासदार संजय राऊतांच्या बाजूने टाळाटाळ सुरू आहे. पालिकेच्या वकिलाने गुरुवारी आणखीन दोन दिवसांचा वेळ न्यायालयाकडे मागितला. त्यावर न्यायाधीशांनी "एरव्ही तुम्ही खूप फास्ट आहात", असा टोला लगावला.
 
 
 
या प्रकरणी कंगना रणौत हिने न्यायालयाचे आभार मानले आहेत. सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रीया न्यायालयाच्या म्हणण्यावर नोंदवली आहे. 'माननीय न्यायमूर्ती तुमच्या आजच्या मतामुळे माझे डोळे पाणावले आहेत. दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार सुरू आहे, माझे जे कार्यालय पालिकेने तोडले ते तसेच उघड्यावर पडून आहे. मी माझ्या नुकसानीचा मोबदला मागत आहे, हे कार्यालयच माझ्यासाठी सर्वकाही आहे.', अशी प्रतिक्रिया तिने नोंदवली आहे.
 
 
कंगना राणावतच्या कार्यालयावर २४ तासांची नोटीस देऊन बुलडोजर लावण्यात आला होता. ती दृश्ये सर्वांनी पाहिली. शिवसेनेच्या मुखपत्रातून "उखाड दिया.." असे छापून त्याचे समर्थन करण्यात आले होते. पालिकेने कारवाई करीत असताना पुरेसा वेळ कंगनाला दिलेला नव्हता. तसेच कोव्हिड काळात कोणतीही कारवाई पालिकेने करू नये तसे अत्यावश्यक परिस्थितीत कारवाई करायची असल्यास न्यायालयाकडून आदेश घ्यावेत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते.
 
 
मात्र कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई करताना पालिकेने न्यायालयाच्या आदेशाकडे कानाडोळा केला. कंगनाच्या वतीने मुंबई महापालिका आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. मात्र आता कंगनाच्या याचिकेला उत्तर दाखल करताना चांगलीच तारांबळ उडालेली आहे. पालिका न्यायलयाकडे वेळ मागून घेते आहे. गुरुवारी पुन्हा दोन दिवसांचा वेळ पालिकेच्या वकीलांनी मागितला. त्याअनुषंगाने न्यायमूर्ती एस. जे. काथावाला यांनी पालिकेला बोल लावले आहेत. कंगनाच्या वतीने नुकसानभरपाईचा दावाही करण्यात आल्याचे समजते. तसेच संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी भविष्यात सुनावणीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
@@AUTHORINFO_V1@@