मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हीच पत्रकार रायकर यांना श्रद्धांजली

02 Sep 2020 18:57:25

nitesh rane_1  


मुंबई :
टीव्ही पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाल्यानंतर आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींचा प्रश्न ऐरणीवर आला असून सर्व स्तरातून सरकारवर टीका होत आहेत. आरोग्य सुविधांच्या या अवस्थेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'पुण्यात टीव्ही पत्रकार रायकर यांचा खुन झाला? असा आरोप त्यांनी केला आहे. हे सत्य आहे. कारण, महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळं जीव गेला. करोना काळात निस्वार्थी भावनेनं सेवा देणारे पत्रकार ही सुरक्षित नाहीत. त्या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या. तीच खरी श्रद्धांजली,' अशी मागणी त्यांनी केली आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही मागणी केली. दरम्यान,कार्डिअॅक अँब्युलन्सच्या अभावी पुण्यात पत्रकार रायकर यांच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकारण तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयावर बोलणे टाळले. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रायकर यांच्या मृत्यूविषयीचा अहवाल मागवला आहे. 'या यंत्रणेनेच माझ्या भावाचा जीव घेतला' अशी संतापाची भावना पांडुरंग रायकर यांच्या बहिणीने व्यक्त केली
Powered By Sangraha 9.0