तुमचं सरकार एका महिलेचा छळ करतंय सोनिया गांधी तुम्ही गप्प का ?

    11-Sep-2020
Total Views | 64

congress_1  H x


मुंबई :
गेल्या दोन दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात सुरू झालेला वाद कमालीचा विकोपाला गेला आहे. मुंबईची पीओकेशी तुलना करणाऱ्या कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केल्यानंतर कंगना राणौत अधिकच संतप्त झाली आहे. अशातच तिने ट्विट करत आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना काही सवाल केले आहे.


'आदरणीय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीजी एक महिला असूनही महाराष्ट्रात तुमच्या सरकारने माझ्यावर केलेल्या वागणुकीमुळे आपण दु: खी होत नाही? डॉ. आंबेडकर यांनी आम्हाला दिलेल्या राज्यघटनेची तत्त्वे पाळण्याची विनंती तुम्ही तुमच्या सरकारला करू शकत नाही का ' असा सवाल कंगनाने सोनिया गांधींना केला आहे. पुढे ती म्हणते, आपण पश्चिमेस वाढलात आणि भारतात वास्तव्य केले आहे. महिलांना कराव्या लागणाऱ्या संघर्षाची तुम्हाला माहिती असेल. जेव्हा आपले स्वत: चे सरकार महिलांना त्रास देत असेल आणि कायदा व सुव्यवस्थेची एकूणच चेष्टा करत असेल तेव्हा आपली शांतात आणि उदासिनता इतिहासात लिहिली जाईल. मला आशा आहे की आपण यात हस्तक्षेप कराल" असे म्हणत कंगनाने आता या वादात काँग्रेसला देखील सवाल केले आहे. आता तिच्या या प्रश्नांवर सोनिया गांधी व काँग्रेस पक्ष काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांविरोधात हक्कभंग - विधानसभा अध्यक्षांकडून प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द

आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांविरोधात हक्कभंग - विधानसभा अध्यक्षांकडून प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द

विधानभवनात गुरुवारी झालेल्या हाणामारीच्या गंभीर घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर निर्णय घेतला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर विधान भवन परिसरात आलेले नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत आलेल्या सर्जेराव टकले यांची चौकशी करून, त्यांच्यावर विशेषाधिकार भंगाची (हक्कभंग) कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द केले आहे. तसेच या दोघांवर फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती नार्वेकर यांनी शुक्रवारी दिली...

कल्याण मधील दोन प्रमुख रस्त्यांच्या उभारणीसाठी २०१ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता !

कल्याण मधील दोन प्रमुख रस्त्यांच्या उभारणीसाठी २०१ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता !

कल्याण पूर्वेतील चेतना नाका ते नेवाळी नाका रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार असून यासाठी एमएमआरडीएने १२४.८७ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली असून लवकरच रस्त्याच्या कामाची निविदा काढली जाणार आहे. तर कल्याण पूर्वेतील काटेमानिवली, सिद्धार्थनगर, तीसगाव नाका हा यू टाइप रस्ता महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाकरिता एमएमएमआरडीएने ७६.८८ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली. रस्त्याच्या कामाचीही निविदा लवकरच काढली जाणार आहे. हा रस्ता झाल्याने कल्याण पूर्वेतील वाहतुकीला..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121