मनात कृतार्थतेची भावना जागवणारा हा क्षण : अतुल भातखळकर

05 Aug 2020 16:57:08

atul bhatkhalkar_1 &



मुंबई :
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. देशभरात आज या ऐतिहासिक सोहळ्याचा जल्लोष पाहायला मिळाला. संपूर्ण देशच नव्हे तर विश्व आज रामनामात दंग झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनातून व्यक्त केली. या सोहळ्याविषयी महाराष्ट्रात देखील उत्साह पाहायला मिळाला. अयोध्येतील ऐतिहासिक सोहळा हा म्हणत कृतार्थतेची भावना निर्माण करणारा ठरला अशी भावना भाजप नेते अतुल भातखळकर यांनी व्यक्त केली. ट्विट करत त्यांनी या सोहळ्याबद्दल आपली भावना व्यक्त केली. ते म्हणतात, "अयोध्येतील ऐतिहासिक सोहळा...मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाचा कालातीत महिमा सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभूतपूर्व भाषण मनात कृतार्थतेची भावना निर्माण करणारा क्षण...आयुष्य धन्य झाले... रामरायाला साष्टांग दंडवत !" असे म्हणत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.




Powered By Sangraha 9.0