पोलीसांना कोरोनापासून वाचवण्यासाठी एक्शन प्लान हवा !

05 Jul 2020 14:29:57
Kirit Somaiya anil Deshmu





भाजप नेते किरीट सोमय्या यांचे गृहमंत्र्यांना पत्र


मुंबई : मुंबई पोलिसांना कोरोनापासून वाचण्यासाठी स्वतंत्र एक्शन प्लॅन हवा, अशी मागणी भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबई पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी व कुटूंबिय असे एकूण सहा हजार जण कोरोना बाधित आहेत. त्यापैकी पाचशे जणांवर उपचार सुरू आहेत. दुर्दैवी बाब म्हणजे एकूण ४० पोलीसांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झाला आहे.




मुंबई पोलीस गेले चार महिने कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था सांभाळत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी आता स्वतंत्र्य एक्शन प्लान तयार करून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे गृहमंत्री अनील देशमुख यांना पत्राद्वारे केली आहे.


Powered By Sangraha 9.0