रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोमवारी रत्नागिरीतील रिमांड होम येथील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. उद्धव ठाकरे यांचा ६० वा वाढदिवस साजरा केला जात आहे. राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. त्यानिमित्त रत्निगिरी येथे मुलांना खाऊवाटप करण्यात आला.
रिमांड होमचे प्रमुख यांच्याकडे खाऊची पाकिटे सुपूर्द करण्यात आली आहेत. यावेळी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, उपनगराध्यक्ष रोशनभाई फाळके, विधासभा क्षेत्रप्रमुख प्रमोदजी शेरे, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, उपशहरप्रमुख विजय खेडेकर, नगरसेवक वसंत पाटील, संजय नाईक, राजू नेरकर अभिजित दुडे आदी उपस्थित होते.