पालकमंत्र्यांच्या बदलीच्या मागणीने धरला जोर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2020
Total Views |

eknath shinde _1 &nb



ठाणे :
ठाणे जिल्ह्यात कोरोना आजाराने कहर केला आहे. यासाठी विद्यमान ४ पालिका आयुक्तांचा बळी देत त्यांची बदली केली आहे. नियोजनात प्रशासनाबरोबर सत्ताधारी पालकमंत्री पण अपयशी ठरले असून नुसती पोकळ घोषणाबाजी करणारे पालकमंत्री बदलावे या मागणीने आता जोर धरला आहे.


ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी पालकमंत्री हटावची मागणी राज्यसरकारकडे केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे / पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी देखील जसे पालिका आयुक्तांची मुख्यमंत्री यांनी बदली केली त्याप्रमाणे ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्रीही बदलावा अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे. ठाणे शहरात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत पालिका आयुक्तांना दोषी धरत शासनाने ठाणे जिल्ह्यातील चार आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. प्रशासन जसे दोषी आहे. त्याप्रमाणे नियमानुसार सत्ताधारी पण तितकेच दोषी आहेत. बहुसंख्याने पालिका पालकमंत्री यांच्या ताब्यात आहेत. पालकमंत्री यांनी मोठी घोषणा करून एक हजार बेड चे रुग्णालय उभे केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन ही केलं. मात्र आज वास्तवात या हॉस्पिटलमध्ये साधा स्टाफ ही नाही. पालकमंत्री कोरोनाच्या उपाययोजना बाबत मोठ्या घोषणा करतात पण वास्तवात त्याची अमलबजावणी होत नाही.



पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण आहेत. महापालिकेकडून मुंब्रा येथील मृतांची नोंद कमी केली जाते. आपल्या स्वत:च्या मतदारसंघात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात दोन्ही मंत्री अपयशी ठरले. मात्र, त्यांना महाविकास आघाडी सरकारने अभय दिले आहे, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी ट्विटरद्वारे केली.



आयुक्तांची बदली करून दोन्ही मंत्र्यांना मोकळे सोडले : भाजपा आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे


ठाणे :
मुंबईत आयुक्त बदललेत, तर मग ठाण्यात पालकमंत्री बदलणार का?, या भाजपा नेते आशिष शेलार यांच्या सवालाची दखल घेऊन, राज्य सरकारने ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांची तडकाफडकी बदली करून, पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मोकळे सोडले, अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांची अवघ्या ३ महिने ३ दिवसांत ठाण्यातून बदली करण्यात आली. ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आयुक्तांनाच जबाबदार धरण्यात आले. मुंबईत आयुक्त बदललेत, तर मग ठाण्यात पालकमंत्री बदलणार का, असा सवाल गेल्या १५ जून रोजी भाजपाचे नेते व आमदार आशिष शेलार यांनी केला होता. या सवालाचीच दखल घेत राज्य सरकारने पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठपका येण्याआधीच आयुक्तांना अपयशाचे वारसदार ठरविले, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली.
@@AUTHORINFO_V1@@