सरासरी गुणपध्दतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम ! : ऍड.आशिष शेलार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2020
Total Views |

ashish shelar_1 &nbs




मुंबई
: पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णयाबाबत विद्यार्थीच संभ्रमात असून, त्याबाबत अनेक सवाल उपस्थित करत भाजप नेते ऍड. आशिष शेलार यांनी कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंगळवारी राजभवनात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शेलार यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांचेही अंतिम वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.




पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेऊन तरुणांच्या माथी "जळीत बीए" प्रमाणे "कोरोना ग्रॅज्युएट" बिरुदावली लागण्याचा त्यांच्या मनात अशा भयगंड निर्माण झाला आहे. शासनाने पदवी अंतिम वर्षाची परिक्षा न घेता सरासरी गुण देण्याचा व गुणसुधार कार्यक्रमात तीन महिन्यानंतर त्यांची परिक्षा घेण्याचा जो निर्णय घेतला तो सर्वसमावेशक विचार करुन घेला का? राज्यातील सर्व विद्यापीठ मिळून एटीकेटी असलेल्या ४० टक्के विद्यार्थ्यांचे काय? त्यांना प्रथम व व्दितीय वर्षात एटीकेटी असल्याने त्यांना नापास करणार का?, असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत. तसेच पूर्वी एका विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका असलेल्या खोलीला आग लागल्याने त्यावर्षीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यांच्या शैक्षणिक करिअरला "जळीत बीए" अशी बिरुदावली लागली. तशी बिरुदावली दुर्दैवाने आता "कोरोना ग्रॅज्युएट" म्हणून लागणार का? विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांचा विचार होणे आवश्यक आहे. या प्रश्नांसाठीच आपण राज्यपालांची भेट घेतल्याचे आमदार ऍड. आशिष शेलार यांनी सांगितले. पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना विविध प्रश्नांनी घेरले असून ते आपल्या शैक्षणिक करिअरबाबत भयभीत आहेत. त्यामुळे कुलपतींनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची योग्यवेळी दखल घेऊन त्यांना चिंतामुक्त करावे, अशी विनंती केल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.



भाजप आमदार ऍड. आशिष शेलार यांनी उपस्थित केलेले प्रश्न :

* राज्यातील विद्यापीठांमध्ये एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेणार? हे विद्यार्थी नापास गृहीत धरले जातील. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये ४० टक्के विद्यार्थी एटीकेटी असलेले आहेत.
* अनेक विद्यापीठांमध्ये पदवीचे अंतिम वर्ष स्पेशलायझेशनचे असते. पहिल्या व दुस-या वर्षामध्ये सर्वच विषयांचा समावेश असतो. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याच्या आवडीच्या विषयांतील गुणांपेक्षा पहिल्या व दुस-या वर्षातील गुणांवरच पदवी देणे योग्य होईल का?
• जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये इंजिनीयरिंग, फार्मसी व अॅग्रिकल्चर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणा-या प्रवेश परीक्षांबाबत धोरण काय? या प्रवेशपरीक्षा रद्द करणार का? लॉ, बी.एड.साठीही प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.
* हा निर्णय पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुध्दा लागू आहे का?
* पुढील शैक्षणिक वर्ष पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएट) अभ्यासक्रम कधी सुरु होणार?
* ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये गुण सुधारणेसाठी परीक्षा देणार असतील तर या गुणसुधारणेचा विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी फायदा होणार का?
* जर गुणसुधार पद्धतीचा फायदा विद्यार्थ्यांना द्यायचा असेल तर शैक्षणिक वर्ष डिसेंबर किंवा जानेवारीत सुरु करणार का?
* विद्यापीठाच्या स्वायत्ततेमध्ये हा सरकारी हस्तक्षेप नाही का?
• विद्यापीठातील सर्व शैक्षणिक घटकांनी एकत्रित विचार करुन निर्णय घेणे योग्य ठरले नसते का?
@@AUTHORINFO_V1@@