लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ४८८ गुन्हे दाखल; २६० लोकांना अटक
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४८८ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २६० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली. राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ४८८ गुन्ह्यांची नोंद कालपर्यंत झाली आहे. आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चीनी अॅप असलेल्या टीकटॉकद्वारे धार्मिक भावना भडकवणाऱ्या २६ जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. तर सर्वात जास्त गुन्हे व्हॉट्सअॅप आणि फेसबूकद्वारे आक्षेपार्ह मजकूर शेअर करणाऱ्यांवर दाखल झाले आहेत.
■ व्हॉट्सॲप- १९५ गुन्हे
■ फेसबुक पोस्ट्स – १९९ गुन्हे दाखल
■ टिकटॉक व्हिडिओ- २६ गुन्हे दाखल
■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ९ गुन्हे दाखल
■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे
■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ५५ गुन्हे दाखल
■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २६० आरोपींना अटक.
■ १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश
■ पुणे शहरातील चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यामध्ये एका गुन्ह्याची नोंद
मुंबईतील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या २९ वर
■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या धार्मिक भावना दुखावून दोन धर्मात तणाव तयार होईल अशा आशयाचा मजकूर असणारी वक्तव्ये मीडियावर व्यक्त केली होती त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून ,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.