नेपाळमधील ‘कोरोना’चा धोका आणि भारताची चिंता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2020   
Total Views |


vicharvimarsh_1 &nbs




भारताने भारत-नेपाळ सीमा सील केल्यापासून भारतामध्ये येणारे हजारो नेपाळी नागरिक हे धरचुला या सीमेवरती असलेल्या गावामध्ये अडकलेले आहेत. एवढेच नव्हे, तर नेपाळच्या मीडिया रिपोर्टप्रमाणे अनेक कोरोनाग्रस्त चिनी नागरिक आपल्या कामाच्या जागेपासून गायब झाले आहेत. तो एक मोठा धोका आहे आणि त्यांना शोधणे गरजेचे आहे. चीन भूसीमांच्या काही ठिकाणांवर नेपाळ सरकारने वैद्यकीय तपासणी कक्ष स्थापन केले आहे. जे अर्थातच पुरेसे नाही.



आपल्याकडे कोरोनाच्या फैलावाबरोबरच सध्या अति-माहितीचाही फैलाव (Information Overload) झाला आहे. माहितीच्या या अतिफैलावाला आपल्या टीव्ही वाहिन्या, आपली समाजमाध्यमे आणि आपण सर्व जबाबदार आहोत. समाजमाध्यमांबरोबर मुख्य प्रवाहातील बहुतेक माध्यमेही वाहवत चालली आहे. तंत्रज्ञानाच्या गैरवापराचा दुष्परिणाम आता समोर येत आहे. समाजमाध्यमांवर पहिल्या १० मेसेजेस नंतर प्रत्येक जास्तीच्या मेसेजेसवर पाच रुपये कोरोना करलावावा. कोरोनावर मात केल्यावर हा कर काढायचा की नाही यावर पुनर्विचार करता येईल. जास्त सोपे म्हणजे सोशल मीडियावरच कर लावा, जितके जास्त अकाऊंट तेवढा जास्त कर. एखादी गोष्ट फुगवून सांगणे हे सध्याच्या समाजमाध्यमांच्या जगात नित्याचेच झाले असल्याने या माहितीच्या महापुरात सत्य काय आणि असत्य काय, हे समजणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे ही ‘चुकीच्या माहितीची साथ’ कशी रोखण्याकरिता हे मोठे पाऊल उचलावेच लागेल.



‘कोरोना’ला ‘चिनी’ व्हायरस म्हणा


‘कोरोना’ व्हायरसला ‘चिनी व्हायरसहे नाव दिले पाहिजे. जागतिक अर्थव्यवस्थेत चीनचे मध्यवर्ती स्थान आणि चिनी प्रवाशांचा जगभर होणारा संचार तसेच ‘वन बेल्ट, वन रोड’ या चीनच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पूर्ततेसाठी गुंतलेले लाखो कामगार यामुळे कोरोना जगभर फैलावला, हे चीनने पूर्ण जगाविरुद्ध चालवलेले तिसरे महायुद्धच समजले पाहिजे. कोरोना विषाणूमुळे जग एकाचवेळी साथीच्या आजाराच्या आणि मंदीच्या विळख्यात सापडले आहे. जागतिक अर्थव्यवस्था २.५ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका अंदाजाप्रमाणे कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला तब्बल दोन ट्रिलियन डॉलरचा फटका बसू शकतो. याकरिता चीनला जगाची झालेली नुकसानभरपाई करण्यास भाग पाडले पाहिजे. याकरिता मित्रदेशांची मदत घेऊन चीन विरुद्ध नुकसानभरपाईकरिता आघाडी उघडली जावी. मात्र, भारतातील काही माध्यमे चीन कसा जबाबदार नाही, असे मानसिक युद्ध खेळत आहेत. त्यांना जाब विचारण्याची गरज आहे.



चीननंतर कोरोनाने इटलीला आपल्या घट्ट विळख्यात घेतले आहे. त्यानंतर चीनने इटली आणि इतर कोरोनासंकटग्रस्त देशांनाही मदत करण्याची तयारी दर्शवली. चिनी मानसिक युद्धामुळे चीन जगभर आपला प्रभाव वाढवणार का? कोरोना आजारावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविल्याचा दावा चीनने केला आहे. मात्र, त्यामागची सत्यासत्यता तपासण्याला वेळ लागेल. असे अनेक प्रश्न भविष्यातील उत्तरांची वाट पाहत उभे आहेत. ही सर्व अनिश्चितता बराच काळ चालणार आहेत.



नेपाळमध्ये सापडले कोरोनाचे संशयित


दक्षिण आशियाचे भवितव्य मात्र भारताशी जोडले गेले आहे. कोरोनाच्या साथीवर आपण कसे नियंत्रण मिळवतो, यावर दक्षिण आशियाई देशांचे भवितव्य अवलंबून आहे. भारताने कोरोना फैलाव रोखण्यासाठी देशाला जगापासून विलग करण्याचे धोरण अवलंबले आहे. विलगीकरणाचे धोरण म्हणून भारत सरकारने परदेशाची विमान सेवा थांबवली आहे.


मात्र
, भारत-नेपाळ आणि भारत-बांगलादेश जमीनसीमांचे काय?

आम्ही
‘कोरोनामुक्त’ आहोत, असे सांगणार्‍या नेपाळमध्ये कोरोनाचे संशयित सापडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भारताने नेपाळ-भारत सीमेवर अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे. नेपाळमार्गे कोरोना विषाणूने भारतात शिरू नये, यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तज्ज्ञांचे पथक सीमेवर तैनात करण्यात आले आहे. देशावर आलेल्या नैसर्गिक संकटाबरोबरच रासायनिक, जैविक, किरणोत्सारी आणि आण्विक अशा सर्व संकटांचा मुकाबला करण्यासाठी त्यांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, हे पुरेसे नाही.


भारताने भारत-नेपाळ सीमा सील केल्यापासून भारतामध्ये येणारे हजारो नेपाळी नागरिक हे धरचुला या सीमेवरती असलेल्या गावामध्ये अडकलेले आहेत. एवढेच नव्हे
, तर नेपाळच्या मीडिया रिपोर्टप्रमाणे अनेक कोरोनाग्रस्त चिनी नागरिक आपल्या कामाच्या जागेपासून गायब झाले आहेत. तो एक मोठा धोका आहे आणि त्यांना शोधणे गरजेचे आहे.चीन भूसीमांच्या काही ठिकाणांवर नेपाळ सरकारने वैद्यकीय तपासणी कक्ष स्थापन केले आहे. जे अर्थातच पुरेसे नाही. भारत-नेपाळ सीमेवर सीमा सुरक्षा बल हे निमलष्करीदल तैनात आहे आणि या सीमेवरून रोज लाखो नेपाळी नागरिक भारतात आणि हजारो भारतीय नागरिक हे नेपाळमध्ये हालचाल करतात. म्हणूनच सीमा सुरक्षा बलाने सतर्क होऊन नेपाळमधून येणार्‍या सगळ्या नागरिकांची कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. कारण, नेपाळमध्ये चीनमधून वेगवेगळ्या कारणाकरिता येणार्‍या चिनी नागरिकांची संख्या लक्षणीय आहे.



नेपाळला उच्च जोखीम असलेल्या देशांच्या यादीत


नेपाळमध्ये याआधी विमानतळांवर कोणत्याही प्रकारची चिकित्सा होत नव्हती. चीनमध्ये जेव्हा कोरोनाने डोके वर काढले होते, तेव्हाही नेपाळ-चीन हवाई सेवा बिनदिक्कतपणे सुरू होती. तसेच नेपाळ-चीन सीमांवरही कोणत्याही प्रकारची तपासणी केंद्रे स्थापन करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कोरोनाचा नेपाळमध्ये प्रवेश झाला आहे. नोकरीनिमित्ताने आखातात तसेच इतर देशांत वास्तव्यास असलेल्या नेपाळी नागरिकांना कोरोनाने ग्रासले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही नेपाळला कोरोना प्रादुर्भाव होण्याची उच्च जोखीम असलेल्या देशांच्या यादीत सूचिबद्ध केले आहे.


जागतिक आरोग्य संघटनेच्या इशार्‍यानंतर खडबडून जाग्या झालेल्या नेपाळने फक्त काही दिवसांपूर्वी कोरोनाविरोधातील लढाई सुरू केली आहे. काठमांडूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी कक्ष उभारण्यात आले असून देशात येणार्‍या आणि देशातून बाहेर जाणार्‍या प्रवाशांची कसून वैद्यकीय तपासणी केली जात आहे. एवढेच नव्हे, तर हजारो नेपाळी नागरिकांनी चीनमध्ये कोरोना प्रभाव वाढल्यानंतर नेपाळमधून भारतामध्ये प्रवेश केला आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर अशा सगळ्या नागरिकांची ज्यांनी नेपाळमधून भारतामध्ये वेगवेगळ्या कारणांकरिता प्रवेश केला, त्यांची कोरोनाकरिता ‘मेडिकल टेस्ट’ होणे गरजेचे आहे. नाहीतर नेपाळच्या द्वारे कोरोना मोठ्या प्रमाणामध्ये भारतात प्रवेश करेल.



अनेक नेपाळी नागरिक भारतात येण्याची शक्यता


मात्र, नेपाळने यंदाच्या वर्षी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘व्हिजिट नेपाळ इयर २०२०’ हा कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाखो पर्यटक नेपाळमध्ये येऊन त्याचा मोठा फायदा नेपाळच्या अर्थव्यवस्थेला होणार होता. मात्र, कोरोनाच्या साथीमुळे नेपाळ सरकारला हा कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारीमध्ये नेपाळला येणार्‍या परदेशी पर्यटकांच्या संख्येत २१ टक्क्यांनी घट झाली आहे. नेपाळला भेट देणार्‍या परदेशी पर्यटकांमध्ये चिनी नागरिकांचा सर्वात मोठा वाटा असतो. २०१९ मध्ये नेपाळला भेट देणार्‍या चिनी पर्यटकांची संख्या १ लाख, ६९ हजार, ५४३ एवढी होती. ती यंदा ३ लाख, ५० हजार पर्यंत पोहोचणार होती. मात्र, ही संख्या घटल्याने नेपाळच्या पर्यटन उद्योगाने हाय खाल्ली आहे. कोरोनामुळे पर्यटन उद्योग सुधारण्याची शक्यता पुढच्या काही महिन्यात दिसत नाही.



कोरोनाच्या भीतीमुळे नेपाळची देशांतर्गत विमानसेवाही कोलमडली आहे. कोरोनाचा एवढा वाईट परिणाम हवाई वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे की, नेपाळमधील अनेक विमानतळांवर विमाने धावपट्ट्यांवरच उभी असल्याचे चित्र आहे. कोरोनाची कोंडी करण्यासाठी कतारने नेपाळसह १४ देशांच्या नागरिकांना आपल्या देशात प्रवेशबंदी जाहीर केली आहे. त्यामुळेही नेपाळच्या अडचणींत भर पडली आहे. कतारमध्ये नोकरी करणार्‍या नेपाळींची संख्या जास्त आहे. कतार सरकारच्या निर्णयामुळे सुमारे ४० हजार नेपाळी कामगारांना नेपाळमध्ये अडकून पडावे लागणार आहे.



आशियाई विकास बँकेच्या अंदाजानुसार, कोरोना विषाणूमुळे नेपाळच्या देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) १३ टक्के घट होण्याची आणि हजारो लोकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळण्याची शक्यता आहे. म्हणून हे नेपाळी नागरिक मजुरीकरिता भारतात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या सगळ्या घटनांवर व त्यामुळे भारतात येणार्‍या नेपाळी नागरिकांवर लक्ष ठेवावे लागेल. 
राजधानी काठमांडूमध्ये तर सॅनिटायझर्स, मास्क आणि इतर महत्त्वाची औषधे इत्यादींचा प्रचंड तुटवडा आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. भारत त्यांना सॅनिटायझर्स, मास्क, इतर महत्त्वाची औषधे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून कोरोनावर मात करण्यास मदत करू शकतो. भारताच्या नेतृत्वाखाली नेपाळसारख्या दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन कोरोनाच्या संकटाला तोंड द्यायला हवे.



@@AUTHORINFO_V1@@