कोरोनाशी लढण्यासाठी भारताला जागतिक आरोग्य संघटनेची साथ

16 Apr 2020 16:31:10

who _1  H x W:
जिनिव्हा : भारतात कोरोना रुग्णांची संख्या १२,०००च्या वर गेली आहेत. अशा परिस्थितीत या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भारताने जागतिक आरोग्य संघटनेची साथ घेण्याचा निर्णय घेतला. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस यांनी या भारताच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. यापूर्वीही पोलिओसारख्या आजारावर भारताने विजय मिळविला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने कोरोनाशी लढण्यासाठी पोलिओच्या वेळी राबविल्या गेलेल्या योजनांचा देशाला फायदा होईल. जागतिक आरोग्य संघटना देशाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासोबत काम करेल.
जागतिक आरोग्य संघटनेचे 'नॅशनल पोलिओ मॉनिटरिंग नेटवर्क' कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी काम करेल त्याचबरोबर आरोग्य कर्मचार्‍यांच्या प्रतिकारशक्तीवर भर देईल. या नेटवर्कच्या कोरोनाबरोबरच क्षयरोग किंवा इतर आजाराशी लढा देणेही सोपे होईल. कोरोनाशी लढण्यासाठी दक्षिण-पूर्व आशिया आरोग्य मंत्रालय व जागतिक आरोग्य संघटनेने नॅशनल पोलिओ मॉनिटरिंग नेटवर्कच्या सहकार्याने पुढाकार घेतला. भारताने या संघटनेच्या मदतीने ज्या पद्धतीने कोरोनाला हरविले होते त्याचपद्धतीने कोरोनाला पराभूत करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, जगभरात २० लाखाहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली. १,३६,००० पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत.
डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस यांनी भारताचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि त्यांच्या नेतृत्व शैलीचे कौतुक केले.भारताने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेत हातमिळवणी केल्याबद्दल त्यांनी भारताचे स्वागत केले. ते म्हणाले की, एकत्र काम करत आपण या साथीवर नक्कीच विजय मिळवू. २०१४मध्ये भारताने पोलिओच्या लढ्यात जागतिक आरोग्य संघटनेचे सहकार्य घेत या आजारावर मात केली होती. आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की, त्यावेळीही भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेने एकत्र काम केले होते आणि विजय मिळविला होता. भारत आणि डब्ल्यूएचओच्या एकत्रित कामगिरी व कुशल समर्पणातून पोलिओवर विजय मिळविण्यास सक्षम ठरले.
Powered By Sangraha 9.0