मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. आजचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ एका सभेतील भाषण होते.अशी टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
ते म्हणाले, "आजचा अर्थसंकल्प म्हणजे अर्थमंत्रीचं जाहीर सभेतील भाषण होता. पहिल्यांदा अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये या भाषणामध्ये कुठलीही आकडेवारी नव्हती. राज्याच्या आर्थिक स्थितीसंदर्भात कुठलेही विश्लेषण नव्हते. मागील वर्षीचा ओपनिंग बँलन्स क्लोजिंग बँलन्स व नवीन वर्षाची आर्थिक वित्तीय तूट याबाबत कुठेही भाष्य झाले नाही. त्यामुळे हा कोणत्याही अर्थाने अर्थसंकल्प नव्हता."
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा सरकारला विसर
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा सरकारला विसर पडला आहे. मराठवाडा वोटर ग्रीड २०हजार कोटींच्या प्रकल्पाला कवळ २०० कोटी देण्यात येणार आहे. या विभागांना काहीही देण्यात आला नाही. सिंचनाच्या संदर्भात कोकणातील वाहून जाणार पाणी उचलून ते उत्तर महाराष्ट्राला द्यायचं हा प्रकल्प आम्ही मागील यावर्षी मांडला होता. शेतकऱ्याचा सातबारा देखील कोरा करण्यात आला नाही. सत्तेचा वचन यांना लक्षात मात्र शेतकऱ्यांना दिलेल्या वचनांचे भंग करून शेतकऱ्यांना एकही नवा पैसे देण्यात आलेला नाही.
केंद्र सरकारच्या मदतीने सगळ्या योजना
१० हजार गावांना पाणीपुरवठा करणारा हा पूर्णतः केंद्र सरकारची योजना आहे. पुणे रिंग रॉड प्रकल्प हा देखील सर्व केंद्र सरकारचा पैसे आहे. इतका सगळं असूनही केंद्र सरकारवर टीका करत अर्थसंकल्पाची नकारात्मक सुरवात करण्यावर महाविकास आघाडीने धन्यता मानली आहे. असेही फडणवीस म्हणाले.
कोणतीही नवीन घोषणा नाही
पायाभूत सुविधांवर कोणताही खर्च सरकार करणार नाही. सौरपंपांची घोषणाही केंद्र सरकारची आहे. ३० लाख पंप केंद्र सरकार देणार आहे. जलयुक्त शिवार योजना बंद केली होती. पण त्याचे निकाल बघता ही योजना मुख्यमंत्री जलसंधारण योजना त्यांनी सुरु केली. दहा लाख तरुणांना रोजगार देणार हि योजना देखील फसवी आहे. त्यातून रोजगार नाही तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तीन वर्षांपूर्वी ७५००० ते १ लाख तरुण आजही प्रशिक्षण घेत आहे. नवीन औद्योगिक धोरणानुसार आम्ही तरुणांना रोजगार देणार्या नवीन योजना सुरु केल्या होत्या, त्याच आता पुन्हा नव्याने सुरु करण्यात येत आहेत. या अर्थसंकल्पात महिला , तरुण व शेतकऱ्यांना काहीही नव्याने मिळालेले नाही. मंदीची भीती दाखवून भटकविण्याच्या प्रयत्न केला आहे.